Anant Chaturdashi esakal
लाइफस्टाइल

Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशी आणि भगवान श्रीविष्णूंचा आहे थेट संबंध, आजच्या दिवशी करा हा उपाय, अडचणी होतील दूर   

हे खास रक्षासूत्र परिधान करण्याचा विधी जाणून घ्या

Pooja Karande-Kadam

Anant Chaturdashi: हिदू धर्मात प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे. आता आजचच घ्या ना. आज अनंत चतुर्दशी आहे. आजच्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केलं जात हे तर तुम्हाला माहितीच आहे. पण, आजचा दिवस भगवान विष्णूंनाही समर्पित आहे.

अनंत चतुर्दशी ही तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी भगवान विष्णूची आराधना, उपवास आणि कथा वाचल्याने शुभ फळांची प्राप्ती होते. तसेच या दिवशी 14 गाठी बांधलेले विशेष रक्षासूत्र (धागा) धारण करावे. भगवान विष्णूच्या कृपेने हे रक्षासूत्र जीवनातील प्रत्येक अडथळे दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.  

अनंत चतुर्दशीच्या दिवशी हे उपाय करा

अनंत चतुर्दशीला व्रत आणि पूजा करण्याव्यतिरिक्त या दिवशी एक उपाय अवश्य करा. अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातात अनंतसूत्र बांधा, ते बांधल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. अनंत सूत्रामुळे प्रत्येक कामात यश मिळते.

सर्वात शक्तिशाली संरक्षण अनंत आहे

अनंत चतुर्दशीला बांधलेला १४ गाठीचा धागा हा १४ लोकांचे प्रतिनिधित्व करतो. यामध्ये भूर्लोक, भुवरलोक, स्वरलोक, महर्लोक, जनलोक, तपोलोक, ब्रह्मलोक, अटल, विठ्ठल, सतल, रसातल, तलताल, महातल आणि पातलोक यांचा समावेश होतो. अनुष्ठानाप्रमाणे बांधून अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत व उपासना केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते.  

या धाग्याला बांधली जाणारी प्रत्येक गाठ प्रत्येक जगाचे प्रतिनिधित्व करते. रेशीम धाग्याने बनवलेला हा धागा माणसाचे संरक्षक कवच आहे, तो बांधल्यानंतर भीतीपासून मुक्ती मिळते,अशीही भाविकांची श्रद्धा आहे.

असे मानले जाते की, जो व्यक्ती चौदा वर्षे सातत्याने सर्व नियमांसह पूजा करतो आणि अनंत सूत्राला चौदा गाठी बांधतो, त्याला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते आणि वैकुंठाची प्राप्ती होते.

रक्षासूत्र कसे परिधान करावे

अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. जवळच्या मंदिरात जा किंवा घरी देवांचे पूजन आरती करा. यासाठी कलश स्थापित करून त्यावर धातूचे भांडे ठेवून अनंताची स्थापना करावी. हा कलश म्हणजे भगवान विष्णूचे रूप आहे. त्यानंतर रेशमी धाग्याला हळद आणि कुंकू लावून रक्षासूत्र तयार करा.

त्या धाग्याच्या १४ गाठी बांधा. फळे, फुले, हळद, अक्षता, प्रसाद इत्यादी अर्पण करून विधीनुसार भगवंताची पूजा करावी. पूजेच्या शेवटी अनंत चतुर्दशीची व्रत कथा वाचा आणि नंतर उजव्या हातात हा पवित्र धागा धारण करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT