Frequent Dizziness In Summer esakal
लाइफस्टाइल

Frequent Dizziness In Summer : उन्हाळ्यात चक्कर येण्याला हलक्यात घेऊ नका? सांगतोय ते ऐका!

चक्कर येण्यावर घरगुती उपाय कोणते?

Pooja Karande-Kadam

Frequent Dizziness In Summer : चक्कर येणं किंवा अचानक डोकं गरगरु लागणं हा कोणताही गंभीर आजार नाही. तर हे एक शारीरिक कमजोरी असण्याचं लक्षण आहे. कधी कधीच चक्कर येणं एखाद्या आजाराचा संकेत देखील असू शकतं. जसं की एनीमिया, बीपी कमी होणं, हृदय कमजोर होणे, ब्रेन ट्यूमर किंवा अतिप्रमाणात ताण तणाव असणं.

खरं तर आपण उन्हातून घरी आलो की आपलं डोकं जड होतं आणि आपल्याला चक्कर येऊ लागते. चक्कर आल्याने उत्साह राहत नाही, विचित्र आणि असहाय्य वाटू लागतं, काम करण्याची इच्छा होत नाही, धड झोपही लागत नाही आणि एनर्जी अचानक कमी झाल्यासारखी वाटू लागते.

उन्हाळा वाढत असताना त्यांना अनेक समस्या येऊ लागतात. ज्याप्रमाणे उन्हाळ्यात उष्ण व कोरड्या हवेमुळे नाकातून रक्त वाहू लागते, त्याचप्रमाणे अति उष्णतेमुळे वारंवार चक्कर येण्याच्या तक्रारी येतात. उन्हाळ्याच्या हंगामात वारंवार चक्कर येण्याचे कारण केवळ उष्णताच नाही तर इतर कोणताही अंतर्गत आजार असू शकते.

उन्हाळ्यात वारंवार चक्कर येण्यामागची कारणे आणि त्यांच्यावर घरी उपचार करण्याचे काही सोपे मार्ग याबद्दल माहिती घेऊयात.

चक्कर येण्याच्या या समस्येला बिनाइनपैरॉक्सिस्मल पोजिशनल वर्टिगो (benign paroxysmal positional vertigo) असं म्हटलं जातं. ज्याला शॉट मध्ये BPPV असंही म्हटलं जातं. ही समस्या वयस्कर लोकांमध्ये आणि जास्त वय असणा-या लोकांमध्ये अधिक दिसून येते.

उन्हाळ्यात चक्कर का येते?

उन्हाळ्याचा ऋतू आपल्या शरीराच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली आणि न्यूरोलॉजिकल सिस्टमवर एकाच वेळी परिणाम करतो. ज्यामुळे बऱ्याचदा चक्कर येणे किंवा चक्कर येण्याची समस्या उद्भवते. त्याचबरोबर अति उष्णतेमुळे काही लोकांना कानाच्या कालव्यात काही बिघाड होऊ लागतो आणि त्यामुळे चक्करही येऊ शकते.

शरीरात दडलेले रोग

काही लोकांना चक्कर येते, विशेषत: उन्हाळ्यात, जेव्हा ते बराच वेळ बसलेले असतात आणि नंतर उठून चालतात. खरं तर जेव्हा असं होतं तेव्हा त्यांच्या रक्तदाबात अचानक बदल होतो आणि याच कारणामुळे अचानक चक्कर येते. या अवस्थेला ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन म्हणतात.

वारंवार चक्कर येण्यावर घरगुती उपाय

शरीर हायड्रेटेड ठेवा

जर तुम्हाला जास्त उष्णतेमुळे वारंवार चक्कर येत असेल तर तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवू देऊ नका. नियमितपणे पाणी प्यावे, ज्यामुळे आपल्या सिस्टमला शरीर थंड ठेवण्यास मदत होईल आणि वारंवार चक्कर येण्यासारख्या समस्या उद्भवणार नाहीत.

लिंबाचे सरबत

उन्हाळ्याच्या दिवसात वारंवार चक्कर येण्याने त्रस्त असलेल्या लोकांसाठीही लिंबू पाणी खूप फायदेशीर ठरू शकते. रोज एका ग्लासमध्ये एक लिंबू पिळून त्याचे सेवन करा. लिंबू आपण कोशिंबीर किंवा इतर कोणत्याही गोष्टीत घालून देखील सेवन करू शकता.

आल्याचा चहा

काही लोकांना उन्हाळ्यातही चहा पिण्याची सवय असते, ज्यामुळे चक्कर येणे किंवा चक्कर येणे यासारख्या समस्या वाढू शकतात. अशावेळी आल्याचा चहा प्यावा, ज्यामुळे चक्कर येण्यासारखी लक्षणे कमी होण्यास मदत होते.

धणे आणि आवळा

रात्री झोपताना एक चमचा धणे आणि सुका आवळा पाण्यामध्ये भिजत घाला. सकाळी हे पाणी गाळून त्याचं सेवन करा. शक्य असल्यास धणे आणि आवळा गुळासोबत चावून खा. यामुळे तुमचं पोट साफ राहिल आणि शरीर नैसर्गिकरित्या मजबूत राहिल.

पुदिना तेल मालिश

एक चमचा खोबरेल तेलात अर्धा चमचा पुदिना तेल मिसळून डोक्यात मसाज करा. असे केल्याने डोके थंड राहते आणि चक्कर येण्यासारख्या समस्या बऱ्याच अंशी कमी होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Nitesh Rane, Disha Salian case : आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणावर नितेश राणे तोंड सांभाळणार, थेट सांगून टाकलं 'धन्यवाद'...

Pathardi Bribery Case : पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलिस अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Marathi News Live Updates : तामिळनाडूतील तंजावर येथे २३ रोजी होणार दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन

SCROLL FOR NEXT