Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency esakal
लोकसभा २०२४

'श्रीकांत शिंदेंना विरोध करणारे वाघ गेले कुठे? आता त्यांना शोधण्याची वेळ आलीये'; उदय सामंतांची टोलेबाजी

गुवाहटीला जाण्याचा जो निर्णय घेतला तो रत्नागिरीच्या भल्यासाठीच घेतला. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.

सकाळ डिजिटल टीम

घरापर्यंत याल तर माझ्याकडेही तुमची जंत्री आहे. जे संस्कार विसरलेत त्यांनी आम्हाला संस्कार शिकवू नयेत.

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या विरोधात निवडणूक लढण्याच्या डरकाळ्या फोडणारे वाघ गेले कुठे? त्यांना आता शोधण्याची वेळ आली आहे. असंतुष्ट महाविकास आघाडीला अजून पंतप्रधानपदाचा उमेदवार सापडलेला नाही, त्यांचे भवितव्य या निवडणुकीत काय आणि त्यांना दुसऱ्याबद्दल बोलण्याचा अधिकार काय? अशी टोलेबाजी करत उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी उबाठा शिवसेना आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) चिमटे काढले.

विवेक हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरील (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency) दावा आजही आम्ही सोडलेला नाही. मात्र, प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. घाबरून उमेदवारी मागे घेतली, अशा आवया उठविण्यात आल्या. मात्र, मी कोणाच्याही धमकीला घाबरत नाही. आमचा विषय सोडविण्यात आम्ही सक्षम आहोत. दुसऱ्यांनी लुडबुड करण्याची आवश्यकता नाही, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, कल्याणमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे एका महिलेला उमेदवारी दिली आहे. त्या महिलेचे आम्ही कौतुक करतो. मात्र, आमच्यासमोर जे उमेदवार देताय ते उमेदवार निदान सक्षम आणि तुल्यबळ तरी द्या, असा खोचक टोला सामंत यांनी लगावला. वैयक्तिक टीकेवर कोणी येऊ नये. घरापर्यंत याल तर माझ्याकडेही तुमची जंत्री आहे. जे संस्कार विसरलेत त्यांनी आम्हाला संस्कार शिकवू नयेत.

राणेंच्या भेटीची चर्चा

राणेंची मी भेट घेतली त्याचीदेखील चर्चा झाली. परंतु, या भेटीमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आलाच पाहिजे, या दृष्टीने काम करण्याचा निर्णय झाला. या सर्व घडामोडीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता भरडला जातो. त्या भावनेतून ट्विट केले होते; परंतु त्याबाबत आम्ही लगेच खुलासा केल्याचे सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरीच्या भल्यासाठीच निर्णय

गुवाहटीला जाण्याचा जो निर्णय घेतला तो रत्नागिरीच्या भल्यासाठीच घेतला. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांनी आजवर जेवढा निधी मिळाल नसेल तेवढी विकास कामे दिली. त्यामुळे अशा व्यक्तीला मोठे करण्याची जबाबदारी आपली आहे, असेही सामंत म्हणाले.

टीका करणे ही संस्कृती नाही

दुसरे टीका करतात म्हणून आपण टीका करणे ही आपली संस्कृती नाही. कारण आपल्याला आपली ताकद माहिती आहे. आपल्याला अन्याय सहन होत नाही. २००५ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असताना आमच्या नगरसेवकांवर अन्याय होत होता. परंतु आम्ही काय करू शकतो, हे तेव्हा दाखवून दिले. १४ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देऊन अशोक मयेकर यांना नगराध्यक्ष केले तर बशिर मुर्तुझा उपनगराध्यक्ष झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT