Ambadas Danve Coffee with Sakal Activities esakal
महाराष्ट्र बातम्या

Ambadas Danve : 'शिवसेना त्या गद्दारांकडं आता ढुंकूनही पाहणार नाही'; दानवेंचा शिंदे गटावर जोरदार प्रहार

शिवसेनेकडे आज नाव, चिन्ह नाही तरीही शिवसेनेचे विरोधक आहेत - विरोधी पक्षनेते दानवे

सकाळ डिजिटल टीम

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची वाट पाहणारेही आहेत. म्हणजेच शिवसेनेची त्यांना भीती आहे, असा टोला त्यांनी शिवसेनेच्या विरोधकांना लगावला.

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (Shiv Sena) फुटलेली असली तरी हे एक मजबूत जनाधार असलेले संघटन आहे. फुटून गेलेल्यांना आता घरवापसी नाही. त्यांच्या जागी नव्या दमाची पिढी, नवे नेतृत्व तयार झाले आहे. त्यामुळे आता शिवसेना गद्दारांकडे ढुंकूनही पाहणार नाही, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेते तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मंगळवारी (ता. आठ) ‘सकाळ’च्या मराठवाडा कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ उपक्रमात संवाद साधला. प्रारंभी निवासी संपादक दयानंद माने यांनी त्यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.

दानवे यांनी ‘सकाळ’ सोबत आपले नाते केवळ वाचक, एक राजकारणी म्हणून एवढ्यापुरतेच मर्यादित नसून याहीपेक्षा आपलेपणाचे वेगळे नाते असल्याचे सांगितले. फुटीनंतरच्या शिवसेनेपासून मराठवाड्यातील शेतकरी, पाणीप्रश्न, इंडिया आघाडीपर्यंत अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने संवाद साधला.

शिवसेनेचे संघटन कुठेच कमी झालेले नाही. शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी येत आहेत. शिवसेनेची ताकद नसती तर असे लोक, पक्ष संघटन जोडले गेले नसते. शिवसेनेकडे आज नाव, चिन्ह नाही तरीही शिवसेनेचे विरोधक आहेत.

तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची वाट पाहणारेही आहेत. म्हणजेच शिवसेनेची त्यांना भीती आहे, असा टोला त्यांनी शिवसेनेच्या विरोधकांना लगावला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघांपैकी एक सिल्लोडचा अपवाद वगळता आम्ही कुठेच कमी झालेलो नाही आणि राज्यातदेखील हीच स्थिती आहे.

राज्यात ३३ टक्के भागांत निधी नाही

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधीच्या कारणावरून ते आक्रमक झाले होते, याविषयी ते म्हणाले, पालकमंत्री मनमानी पद्धतीने काम करत आहेत. आम्ही सत्तेत असताना सत्ताधारी आमदाराला तीन कोटींचा निधी दिला, तर विरोधी आमदाराला दोन कोटी दिले जायचे. मात्र, विद्यमान सरकार आणि त्यांच्या पालकमंत्र्यांनी विरोधी आमदारांना निधीच न देण्याचा चुकीचा पायंडा सुरू केला आहे. राज्यातील ९० मतदारसंघांत या सरकारने विकासनिधी दिलाच नाही. टक्केवारीत हे प्रमाण काढले तर राज्याचा ३३ टक्के भाग हा या सरकारने विकासापासून वंचित ठेवला.

शासन आपल्या दारी मग ही गर्दी कशी?

दानवे यांनी हे संवेदनाहीन, निर्ढावलेले सरकार असल्याची टीका केली. सरकारच्या पैशावर शासन आपल्या दारी उपक्रम सुरू आहे. जर शासन दारी येत असेल तर मग लोकांची कामे होत नाहीत म्हणून ते मंत्रालयात गर्दी करतात, ते कशाचे द्योतक आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार हरिभाऊ बागडे यांना पंचायत समितीमध्ये काम होत नसल्याने ठाण मांडून बसावे लागले. हे सरकार फक्त बोलते. सरकारी पैशाने शो करत असल्याची टीका केली.

समन्यायी पाणी वाटप हवे

मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. समुद्रात वाहून जाणारे कोकणातील पाणी मराठवाड्याकडे वळवण्याची महत्त्वाकांक्षी योजना झाली मात्र पुढे काहीच प्रगती झाली नाही. मुकणे- वैतरणा जोडण्यासाठी निविदा निघाली मात्र पुढे अजूनही सरकार उदासीन आहे. समन्यायी पाणी वाटप झाले तरच मराठवाड्याचा विकास होणार आहे, यासाठी पाण्याचे समन्यायी वाटप झाले पाहिजे असे मत व्यक्त केले.

पावसाळी अधिवेशनातील चर्चेच्या अनुषंगाने ते म्हणाले, विरोधी पक्ष म्हणून आम्ही जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. कायदा व सुव्यवस्था, राज्यातून बाहेर जाणारे उद्योग, शेतकऱ्यांची नुकसानभरपाई, कांद्याचे अनुदान, माथाडी कामगार कायद्यासारखे विषय लावून धरले. आमच्या दबावामुळेच सरकारला माथाडी कामगार कायदा मागे घ्यावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT