Bhagat Singh Koshyari sakal
महाराष्ट्र बातम्या

Bhagat Singh Koshyari: शिवजयंतीपूर्वीच कोश्यारी महाराष्ट्रातून जाणार, नव्या राज्यपालांचा 'या' दिवशी शपथविधी?

अनेक वादग्रस्त विधानांमुळं राज्यभरात संताप व्यक्त होत होता. तसेच राज्यपालांना हटवण्याची मागणीही करण्यात येत होती.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अनेक वादग्रस्त विधानांमुळं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याविरोधात राज्यभरात संताप व्यक्त होत होता. तसेच राज्यपालांना हटवण्याची मागणीही करण्यात येत होती. यापार्श्वभूमीवर राज्यपाल कोश्यारी यांनी स्वतःहून आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सादर केला. त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला असून त्यांच्याजागी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर त्यांच्या शपथविधीची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. (Bhagat Singh Koshyari will leave Maharashtra before Shiv Jayanti)

सूत्रांच्या माहितीनुसार, नवनियुक्त राज्यपाल बैस यांचा थपथविधी १७ किंवा १८ फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचाच अर्थ असा की, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान करणारे आणि याचमुळं अडचणीत आलेले मावळते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे शिवजयंतीपूर्वीच अर्थात १९ फेब्रुवारीपूर्वीच महाराष्ट्रातून जाणार आहेत.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे दैवत असलेल्या महापुरुषांबद्दल वारंवार वादग्रस्त विधानं केली होती. यामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज तसेच गुजरातींचं समर्थन करताना महाराष्ट्राला कमी लेखल्याचं विधान त्यांनी केलं होतं.

शिवाजी महाराजांबद्दल वारंवार वादग्रस्त बोलल्यानं त्यांच्याविरोधात नागरिकांसह विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांना पदावरुन हटवण्याची जोरदार मागणी देखील करण्यात येत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : डेटिंग ॲप वर मुलीचे बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT