Rahul Gandhi And Bharati Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

कोरोना मृतांचा आकडा राहुल गांधींनी आणला कुठून ? भारती पवार यांचा सवाल

'कोळसा प्रश्नावरून केंद्र सरकारवर खापर फोडणे योग्य नाही.'

सकाळ डिजिटल टीम

उस्मानाबाद : कोरोना काळात देशभरात ४० लाख नागरिकांचा मृत्यू झाल्याचे कॉंग्रेस नेते राहुल गांधी सांगत आहेत. त्यांनी हा आकडा आणला कुठून, हे त्यांनी केंद्राला सांगावे, असा सवाल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) यांनी सोमवारी उस्मानाबाद (Osmanabad) (ता. १८) येथे केला आहे. कोरोना साथीच्या काळात केंद्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे देशभरात सुमारे ४० लाख नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना डॉ. पवार म्हणाल्या, देशभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पोर्टलवर दररोज दिली जाते. (Bharati Pawar Ask Rahul Gandhi For Corona Death Numbers)

ही आकडेवारी गावागावांत भरली जाते. त्यानंतर त्या-त्या राज्यांतून आकडे केंद्राकडे येतात. ते पोर्टलवर तातडीने अपडेट होतात. असे असताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हा आकडा आणला कुठून?, असा प्रश्न त्यांनी केला आहे.

वीजेचे खापर केंद्रावर नको

राज्यात विजेची समस्या भेडसावत आहे. कोळसा प्रश्नावरून केंद्र सरकारवर खापर फोडणे योग्य नाही. राज्य शासनाने योग्य नियोजन केले तर निश्चित हा प्रश्न मार्गी लागू शकतो, असा उपरोधिक सल्लाही डॉ. पवार यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT