Chitra Wagh  sakal
महाराष्ट्र बातम्या

'राज्यसरकार असेल थंड; आता आम्हीच पुकारू बंड'

कायदा आणि सुवव्यवस्था यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

वर्ध्यातील आर्वी (Aarvi) येथील गर्भपात प्रकरणाची चौकशी आता विशेष तपास पथकाद्वारे (SIT) होणार आहे. याप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे. कायदा आणि सुवव्यवस्था यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या घटनेते ११ कवट्या ५४ हाडं आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे. याप्रकरणी आरोपी महिला डॉक्टरनं आपला गुन्हा कबूल केल्याचं पोलिसांनी सांगितलं. यावर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीटद्वारे व्हिडिओ शेअर केला आहे. कायदे कमजोर नाहीत, कायद्याच्या रक्षणकर्त्यांचा जोर ओसरलाय. राज्यसरकार असेल थंड, तर आता आम्हीच पुकारू बंड असेही त्या म्हणाल्या आहेत.

त्या म्हणतात, राज्यात अपहरणकर्ती टोळी तर फिरतच आहे, आणि आता तर अल्पवयीन तरूण मुलींच्या अवैध गर्भपाताचा गोरखधंदाही उघड झाला आहे. ३०-३० हजारात सौदेबाजी सुरु आहे. चिमुकल्या जीवांशी खेळ चालु आहे. तेरा वर्षाच्या एका मुलीवर अत्याचार करण्यात आला. ती गर्भवती राहिली आणि आरोपीने तीस हजारात गर्भपात करुन घेतला. ११ जानेवारीला ही घटना समोर आली. त्याठिकाणी पोलिसांनी तात्काळ धाव घेतली. काही कवठ्या, हाडे, गर्भ पिशव्या याठिकाणी सापडल्या. याचा अर्थ मोठा गोरखधंदा तिथं चालू होता, किती गर्भपात केले गेले, किती मुलांना मारलं गेलं, किती चिमुकल्यांची हत्या केली गेली हे सांगता येणार नाही. या घटनेने सांगलीच्या म्हैसाळची पुनरावृत्ती झाल्याची आठवण झाली.

या घटनेवेळेही सरकार ॲक्शनमध्ये आलं. पीसीपीएनडीटी अॅक्ट त्याची अंमलबजावणी, फ्लाईंग स्कॉड या सगळ्या गोष्टी केल्या. परंतु गेल्या अडीच वर्षांमध्ये पुन्हा एकदा सगळं थंड बास्तनामध्ये पडलं आहे. या सगळ्या प्रकरणाचा मूळ हे राज्याच्या कायदा व सुव्यवस्था यांच्याकडं जातं, असही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

पुढे त्या म्हणाल्या, गेल्या अडीच वर्षांत निर्माण केलेल्या या फ्लाईंग स्कॉडने नक्की काय काम केले आहे. त्यांची अकाऊंटॅबिलीटी कुणी केली आहे का ? याची माहितीही महाराष्ट्राला मिळणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर ती नक्कीच गृहविभाग आणि पब्लिक हेल्थ यांनी एकत्र येऊन एखादा प्लॅन बनवला पाहिजे. कायदे हे कधीच कमजोर असतात पण त्याची अंमलबजावणी करणारे मात्र त्याठिकाणी कमजोर झाले आहेत, असा घणाघातही त्यांनी केला आहे. राज्यांमध्ये 25 हजार महिला गायब झाल्याची धक्कादायक माहिती गृह मंत्र्यांनी दिलेली आहे आणि त्याच्या कित्येक मुलींसोबत कसा प्रकार झाला असेल याची भीती वाटते आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सूचवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

Pune Crime : युवकांकडून संघटित गुन्हेगारी घडवण्यात बंडू आंदेकरचा हातखंडा

Asia Cup 2025: UAE च्या विजयाने पाकिस्तानला दिलंय टेन्शन! सुपर फोरमध्ये कोण मिळवणास स्थान?

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

Nepal Sushila Karki Government : नेपाळच्या सुशीला कार्की सरकारचा मोठा निर्णय! आंदोलनात जीव गमावलेल्या ‘Gen-Z’ ना शहीद दर्जा!

SCROLL FOR NEXT