महाराष्ट्र बातम्या

राज्यात यावर्षी विक्रमी साखर उत्पादन! साखर आयुक्तालयाने वर्तवला अंदाज

प्रदीप बोरावके : सकाळ वृत्तसेवा

राज्यात 112 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज साखर आयुक्तालयाने वर्तविला आहे.

माळीनगर (सोलापूर) : महाराष्ट्र पुढील वर्षीच्या गाळप हंगामात यावर्षीप्रमाणेच पुन्हा एकदा विक्रमी साखर (Sugar) उत्पादनाचा साक्षीदार ठरण्याची शक्‍यता आहे. ऑक्‍टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामात राज्यात 112 लाख टन साखर उत्पादन (Sugar production) होण्याचा अंदाज साखर आयुक्तालयाने वर्तविला आहे.

राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ग्राहक संरक्षण मंत्रालयास याबाबत एक पत्र लिहिले आहे. 2021-22 च्या गाळप हंगामात राज्यात 12.32 लाख हेक्‍टर क्षेत्रातील ऊस गाळपासाठी उपलब्ध असेल, असा अंदाज त्यांनी पत्रात व्यक्त केला आहे. येत्या हंगामात एक हजार 96 लाख टन ऊसाचे गाळप होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यंदा एक हजार 12 लाख टन उसाचे गाळप होऊन झालेल्या 106.3 लाख साखर उत्पादनापेक्षा पुढील हंगामातील साखर उत्पादन अधिक राहील.

आगामी हंगामात इथेनॉल उत्पादनाकडे वळविलेल्या साखरेसह 122 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील हंगामात साधारण 10 ते 15 टन साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळण्याची शक्‍यता आहे. इथेनॉलकडे वळलेल्या साखरेसह 11.13 टक्के सरासरी साखर उतारा मिळण्याचा अंदाज आहे. इथेनॉलमध्ये रूपांतरित होणारी साखर वगळता 10.21 टक्के साखर उतारा राहण्याची शक्‍यता आहे. राज्यात स्थापित असलेल्या 245 साखर कारखान्यांपैकी अनेक कारखाने आर्थिक ओझ्यामुळे सुरू होण्याची शक्‍यता नाही.

येत्या हंगामात साधारण 192 कारखाने सुरू होण्याचा अंदाज आहे. यंदाच्या हंगामात 190 कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला होता. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) मते, निधीची तरलता राखून ठेवण्यासाठी कारखान्यांना आर्थिक दबावाखाली कमी किमतीत सध्या साखर विकावी लागत आहे. त्यामुळे अनेक कारखाने निश्‍चित केलेली एफआरपी देऊ शकत नाहीत.

ऊस लागवड वाढण्याची शक्‍यता

सातत्याने होणाऱ्या लॉकडाऊनमुळे राज्यात ऊस लागवडीत वाढ होण्याची शक्‍यता आहे. बहुतांश भाजीपाला व अन्नधान्य उत्पादन घेणारे शेतकरी लॉकडाऊनमुळे वारंवार मार्केट बंद राहत असल्याने ग्रस्त झाले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी खात्रीशीर उत्पन्न मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.

येत्या हंगामात ऊसाच्या क्षेत्रात वाढ होत असल्याने साखर व इथेनॉल उत्पादन देखील वाढणार आहे. त्यानुसार नियोजन करावे लागणार आहे. ऊस क्षेत्रात वाढ होत असल्याने यंदाचा गाळप हंगाम लवकर सुरू करण्याबाबत विचार करावा लागणार आहे.

- शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

SCROLL FOR NEXT