महाराष्ट्र बातम्या

शाळा कधी सुरु होणार?, अजित पवारांनी दिलं उत्तर

नामदेव कुंभार

Schools Reopen : कोरोनाची दुसरी लाट थंडावल्यानंतर अनेक राज्यात शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही शाळा कधी सुरु होणार? याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. राज्यातील शाळांबाबात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश झारखंड, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यात शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. पण महाराष्ट्राने अद्याप वेट अण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना असणारा धोका लक्षात घेऊन शाळा सुरु करण्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

देशामध्ये काही राज्यात शाळा सुरु केल्यानंतर त्याठिकाणी रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसले. त्यामुळे राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी शालेय कर्मचाऱ्यांना लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानंतरच शाळा सुरु करण्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार म्हणाले.

वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?

राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यापूर्वी पालक आणि शिक्षकांना योग्य प्रशिक्षण आवश्यक आहे. यासंदर्भात टास्क फोर्सकडून जेव्हा सूचना येतील, त्यानंतर शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

कोरोना महामारीमुळे जवळपास दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला. कोरोनाच्या काळात शाळेपासून महाविद्यालयापर्यंत दरवाजे बंद आहेत. या काळात ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. मात्र शाळा कधी सुरु होणार? याकडे पालकांचे लक्ष लागलं आहे. लहान मुलांसाठी लस उपलब्ध नाही. त्यामुळे राज्य सरकारने तुर्तास वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही तालुक्यात जमिनी खरडून वाहून गेल्या. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. नुकसान झालेले जिल्हे, गावं यांचे पंचनामे तातडीने कारवाई करण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अतिवृष्टी बाधित जिल्ह्यांचे पालकमंत्री त्या त्या जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा करतील तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून ते पूरग्रस्त भागावर लक्ष ठेवून आहेत. औरंगाबाद-धुळे महामार्गावर पावसानंतर भूस्खलन झाल्याने रस्तावर मोठे दगड आले आहेत. पीडब्लूडी शर्थीने वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहे. दगड बाजूला काढण्यासाठी ज्या काही साधनांची आवश्यकता आहे, त्याची पूर्तता करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

Tata Tiago 2026 : पेट्रोल-CNG-EV एकत्रच लाँच; टाटाची सर्वात स्वस्त कार, सेफ्टी फिचर्सही वाढवली

"प्रयोग गेले, चित्रपट गेला आणि मी तोंडावर पडले" लक्ष्मीनिवास फेम अभिनेत्रीने सांगितला तिला आलेला विचित्र अनुभव

SCROLL FOR NEXT