ramraje-naik-nimbalkar
ramraje-naik-nimbalkar 
महाराष्ट्र

विधान परिषदेचे उपसभापतिपद बिनविरोध करा : रामराजे नाईक निंबाळकर

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - कोरोना विषाणूंच्या जागतिक साथीचा विचार करून विधान परिषदेच्या उपसभापतिपदाची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवारी विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना केली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंगळवारी (ता. ८) होणाऱ्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तर भाजपकडून भाई गिरकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. तत्पूर्वी परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कोरोनामुळे अनेक सदस्य सभागृहात उपस्थित राहू शकत नसल्याने त्यांच्या मतदानाच्या अधिकारावर गदा येत असल्याने ही निवडणूक पुढे ढकलावी, निवडणूक घेण्याची घाई करू नये असे आवाहन सत्ताधारी पक्षाला केले.

सभापती रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, सध्या कोरोनाची साथ आहे. मी सुद्धा सतत फिरत असतो. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी. यावेळी सभागृहात उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील विरोधी पक्षासोबत चर्चा केली जाईल, असे स्पष्ट केले.   

उपसभापतिपदासाठी विजय ऊर्फ भाई गिरकर यांचा अर्ज भरला असला तरी भाजपचे तब्बल सहा सदस्य अधिवेशनाला उपस्थित नाहीत. डॉ.परिणय फुके आणि गोपीचंद पडळकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने ते दोघे गैरहजर आहेत तर विदर्भातील काही आमदार अधिवेशनाला आलेलेच नाहीत.

भाजपची संख्या चारने कमी?
परिषदेतील संख्याबळ लक्षात घेता भाजपची संख्या महाविकासआघाडीपेक्षा चारने कमी आहे. सध्या १२ सदस्यांच्या नेमणुका झालेल्या नाहीत. पण शिक्षक आमदारांची मते कुणाला यावर बरीच गृहितके अवलंबून आहेत.

विधान परिषद क्षणचित्रे 

  • सुमारे २९ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडल्या.
  • प्रसाद लाड, मनीषा कायंदे, संजय दौंड आणि अमरनाथ राजूरकर यांची तालिका सभापती म्हणून नावे जाहीर  
  • शिवसेनेच्या  डॉ. नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड, भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील, रमेश कराड, प्रवीण दटके या नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. 
  • भाजपचे गोपीचंद पडळकर सभागृहात उपस्थित नव्हते.

भाजपने केला सभात्याग 
मुंबई - निवडून आलेली किंवा सरकारी सेवेत असलेली व्यक्तीच लोकसेवक असू शकते, या तत्त्वाला हरताळ फासणारा सरपंच निवडीबद्दलचा अध्यादेश लोकशाहीचा खून करणारा असल्याचा आरोप करत आज भाजपच्या सदस्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विधानसभेतून सभात्याग केला. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या कार्यकर्त्यांना सरपंच नेमण्याचा डाव रचत असल्याचा आक्षेप घेत या निर्णयाला न्यायालयात विरोध करण्यात आला होता.

उच्च न्यायालयात महाधिवक्त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेतला जाणार नाही असे सांगितले असतानाही आज सरकार त्या आश्वासनाला हरताळ फासत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी कायदा उल्लंघलेला नाही, कोणतीही घटनाबाह्य भूमिका घेतलेली नाही असे सांगितले. त्यानंतर संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी विधेयक मांडायला परवानगी नाही असे कुठे नमूद केले आहे अशी भूमिका घेतली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही अध्यादेश मांडण्यास मज्जाव केला जाऊ शकत नाही असे नमूद केले.त्यावर सरकारची लोकशाही विरोधी भूमिका न्यायालयाने ग्राह्य धरलेली नाही .सरकार नियमांना हरताळ फासत असल्याचा आरोप करत भाजपने सभात्याग केला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : निसर्गाचा अप्रतिम नजारा पाहायचाय? मग, महाराष्ट्राच्या 'या' माऊंट एव्हरेस्टला नक्की द्या भेट

T20 WC 24 Team India : T20 मध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

Raghuram Rajan: भारताचा वास्तविक विकास दर 8 ते 8.5 टक्के नाही तर...; रघुराम राजन यांनी दाखवले अर्थव्यवस्थेचे दोन चेहरे

SCROLL FOR NEXT