MIM
MIM 
महाराष्ट्र

मोजक्याच जागांवर ‘लक्ष्य’चा एमआयएमचा फॉर्म्युला यशस्वी, तेलंगणानंतर बिहारमध्ये सर्वांत मोठे यश

शेखलाल शेख

औरंगाबाद : तेलंगणानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाने (एमआयएम) बिहार विधानसभा निवडणुकीत पाच जागा जिंकत सर्वांत मोठे यश मिळविले आहे. अनेकांचे अंदाज चुकवत त्यांनी पाच जागा जिंकल्याने महाआघाडीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले. बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएने मोजक्या २० जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यांना एकूण ५ लाख २३ हजार २७९ मते म्हणजेच १.२४ टक्के मते मिळाली. एमआयएमला हैदराबादनंतर बिहारमध्ये यश मिळाले आहे. आता तेलंगणा, महाराष्ट्र, बिहार अशा तीन राज्यांत एमआयएमचे आमदार आहेत. काँग्रेसचा पारंपरिक मतदार असलेला मुस्लिम समाज एमआयएमकडे वळत असल्याने काँग्रेसच्या चिंतेत भर पडत असून त्यांच्या पारंपरिक व्होट बँकेला तडे जात आहेत.


जुन्या हैदराबादेत प्रभाव असलेल्या एमआयएमचे तेलंगणा विधानसभेत सात तर विधानपरिषदेत दोन आमदार आहेत. यानंतर त्यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करत २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्य आणि भायखळा अशा दोन ठिकाणी विजय मिळविला होता. २०१४ पासून एमआयएमने दलित-मुस्लिमबहुल मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून उमेदवार दिले होते. तोच फॉर्म्युला २०१९ च्या निवडणुकीत वापरला. २०१९ मध्ये मालेगाव मध्यमधून मौलाना मुफ्ती इस्माईल तर धुळे शहर मतदारसंघातून फारूक शाह असे दोन आमदार विजयी झाले. यानंतर बिहारच्या सीमांचल या मुस्लिमबहुल भागावर लक्ष केंद्रित केले होते. २०१८ मध्ये किशनगंज विधानसभेच्या पोटनिवडणुकीत एमआयएमचे कमरूल हुदा यांनी विजय मिळवत पक्षाची एंट्री करून दिली होती; मात्र २०२० च्या निवडणुकीत त्यांना ही जागा राखता आली नाही. इतर पाच जागांवर मात्र त्यांनी विजय मिळविला.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया : मराठा समाजातील विद्यार्थी संभ्रमात, कोणत्या संवर्गातून अर्ज करावा?

मुख्य लढत भाजप-जनता दल संयुक्त सोबत
एमआयएमची मुख्य लढत भाजप आणि संयुक्त जनता दलासोबत झाली. येथे काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर गेले. बहादूरगंज मतदारसंघात एमआयएमच्या अंजर नईमी यांना ८५ हजार ८५५ मते मिळाली. येथे विकासशील इन्सान पार्टी दुसऱ्या क्रमांकावर राहिली. अमौर विधानसभा मतदारसंघात अख्तुरुल इमान विजय झाले त्यांना ९४ हजार ४५९ मते मिळाली. संयुक्त जनता दलाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला. जोकीहाटमध्ये शहनवाज आलम यांना ५९ हजार ५२३ मते मिळाली. त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला. कोचाधामन येथून इजहार अस्फी विजयी झाले. त्यांना ७९ हजार ८९३ मते मिळाली. त्यांनी जनता दल संयुक्त उमेदवाराचा पराभव केला तर बायसी मतदारसंघातून रुकनुद्दीन अहमद यांनी विजय मिळविला. त्यांना ६८ हजार ४१६ मते मिळाली. येथे भाजप उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

काँग्रेसची वाढती चिंता
मोजक्याच जागांवर लक्ष केंद्रित करून लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मुस्लिम, दलित मते वळविण्यात एमआयएम, वंचित बहुजन आघाडीला यश आले होते. त्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीला चांगलाच फटका बसला. आता बिहारमध्ये सुद्धा मुस्लिम मते एमआयएमकडे जात असल्याने काँग्रेसची चिंता वाढली आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

SCROLL FOR NEXT