Monsoon Sakal
महाराष्ट्र बातम्या

विदर्भ, कोकणाला पाऊस झोडपणार; आजपासून पावसाचा जोर वाढणार

मध्य भारतातही बहुतांश भागातही येत्या पाच दिवसांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतात आता मान्सूनचं आगमन झालेलं आहे. मान्सून आता दक्षिण-पश्चिम विस्तारला आहे. त्यामुळेच काही भागांत अतिवृष्टी झाल्याच्या बातम्या येत आहेत. हवामान विभागाने आता गुजरात, ओडिसा, झारखंडचा काही भाग, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. तर उत्तर प्रदेश, पंजाब, हरयाणा, दिल्ली आणि जम्मू काश्मीरमध्येही हलक्या सरींची शक्यता आहे. (Maharashtra Monsoon Updates)

येत्या पाच दिवसांमध्ये अनेक राज्यांत पावसाची शक्यता आहे. गुजरात, कोकण, गोवा, कर्नाटकाचा किनारपट्टीचा भाग, तेलंगण, तमिळनाडू, पाँडिचेरी, केरळ या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर ४ ते ७ जुलै या काळात मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Weather Updates)

हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मध्य भारतातही बहुतांश भागातही येत्या पाच दिवसांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि विदर्भातही मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे.झारखंड, सिक्कीम, ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्येही येत्या पाच दिवसांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तिकिटासाठी २.७ कोटी मागितले! नेत्याचा आरोप, माजी मुख्यमंत्र्यांच्या दारात कपडे फाडून घेत जमिनीवर लोळला

Raj Thackeray : महाराष्ट्रात नवे ९६ लाख खोटे मतदार, आगामी निवडणुकांचा निकाल आधीच ठरलाय; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

Mumbai Metro: मेट्रो प्रवासासाठी मिळणार फुल रेंज, नेटवर्कचा प्रॉब्लेम सुटला! प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

Kolhapur Drown Case : कोल्हापूर जिल्ह्यात चार जणांचा बुडून मृत्यू, ऐन दिवाळीत दुर्देवी घटना

IND vs AUS 1st ODI : विराट कोहलीचा लाजीरवाणा विक्रम; रोहित शर्मा, सौरव गांगुली झाले असतील खूश, कारण...

SCROLL FOR NEXT