Devendra Fadnavis on Nana patole Devendra Fadnavis on Nana patole
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्राचे मंत्री गुजरातचे हितचिंतक झालेत; नाना पटोलेंचे टीकास्त्र

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवील

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे नेत गुजरातचे (Gujarat) नेतृत्व केव्हा पासून करू लागले. धारावीच्या पूर्ण विकासाचा विचार ते का करीत नाहीत? असा टोला काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी लगावला. आज त्यांनी ट्विट करत निशाणा साधला. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवील. पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यावर निशाणा साधताना पटोले म्हणाले, धारावी पुनर्विकास प्रकल्पाकरिता रेल्वेची ४५ एकर अतिरिक्त जमीन मिळवण्यासाठी राज्य सरकारने केंद्राला ८०० कोटी रुपये दिले. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी ८०० कोटी दिले अस समजायचं. पण, २०० कोटी जोपर्यंत तुम्ही देत नाही तोपर्यंत आम्ही जागा देणार नाही असे स्टेटमेंट फडणवीस यांनी केले आहे. असा आडमुटेपणा जर भाजपाचा असेल तर देशाचा विकास कसा होणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवील. पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच

धारावीच्या झोपडपट्टीचा मुद्दा उपस्थित करताना पटोले म्हणाले, महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे नेत गुजरातचे नेतृत्व केव्हा पासून करू लागले. जनतेच्या हितासाठी काही नियम आपण शिथिल करतो. याला सरकार म्हणतात. मात्र भाजप ज्या पध्दतीने वागत आहे हे बरोबर नाही. मोदी सरकारमधील महाराष्ट्राचे मंत्री कधीपासून गुजरातचे हितचिंतक झालेत? धारावीच्या पूर्ण विकासाचा विचार ते का करीत नाहीत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT