मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अखंड भारत या वक्तव्यावर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. केंद्रात संघ विचाराचे सरकार आल्यापासून देशात विष कालवून समाज तोडण्याचे काम चालू आहे. अशा पद्धतीने देश तोडून अखंड भारत कसा साकार होईल, असा प्रश्न काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोहन भागवत यांच्यासह संघावर केला आहे. ते आज शुक्रवारी (ता.१५) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी यांनी अखंड भारताबद्दल केलेल्या विधानाचे आश्चर्य वाटण्याचे कारण नसल्याचे पटोले म्हणाले. (Nana Patole Ask Mohan Bhagwat, How Possible Akhand Bharat)
संघाची विचारसरणी ही तोडणारी आहे. त्यातूनच सामाजिक वातावरण बिघडवण्याचे काम केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्रात संघाच्या विचारांचे सरकार असल्याने समाजात द्वेष पसरवण्यास बळ मिळत असल्याचे पटोले म्हणाले. अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखंड भारताचे व्हिजन काय ?
केंद्राकडून कोळसा पुरवठा होत नसल्याने राज्यात विजेचे संकट निर्माण झाले आहे, असे पटोले म्हणाले. केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी परदेशातून कोळसा आणण्याचा सल्ला दिला आहे. तो आयात केल्यास त्याचा फायदा भाजपच्या काही उद्योगपतींच मिळेल. मात्र आयात कोळशामुळे वीज महाग होईल. त्याचा भुर्दंड सर्वसामान्य ग्राहकांनाच सोसावा लागेल, असे नाना पटोले म्हणाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.