Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

भाजप-शिवसेनेला वडिलधारी म्हणून माझा 'हा' सल्ला : शरद पवार

वृत्तसंस्था

मुंबई : भाजप आणि शिवसेनेला लोकांनी सर्वाधिक जागा दिल्या आहेत. त्यांनी सरकार स्थापन करायला हवे. यापूर्वी सगळ्यांनी वेगवेगळी निवडणूक लढविली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून महाराष्ट्रातील अनेक शब्दांची माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्यांच्याजवळ जनादेश आहे, त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करावे. मित्रांनी एकमेकांशी असे खोटं वागू नये, असे मी वडिलधारी म्हणून सांगतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. 

अयोध्येतील वादग्रस्त जमीन ही रामलल्लाचीच असून, याठिकाणी राम मंदिर उभारण्यासाठी सरकारला ट्रस्ट बनवावे लागणार आहे. तसेच अयोध्येत सुन्नी सेंट्रल वक्‍फ बोर्डाला 5 एकर जमीन देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे सरकारच्या या ऐतिहासिक निकालाचे देशभरातून स्वागत करण्यात आले आहे. 

याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, की आज न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे देशासमोर असलेला गंभीर प्रश्न सुटला आहे. समाजातील सर्व वर्गाचे हित पाहून हा निर्णय आला आहे. देशातील जनतेला मला आवाहन असून, या निर्णयाचे स्वागत सन्मानाने केले पाहिजे. तसेच शांती ठेवण्याचे काम केले पाहिजे. मैलाचा दगड ठरणारा हा निर्णय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशासमोर अयोध्येचा प्रश्न होता. बाबरी मशीद पाडल्यानंतर देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी मी सरकारमध्ये होते. मुंबईत झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मला महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठविले होते. न्यायालयाने घेतलेला हा निर्णय देशासाठी आहे. कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नागपूर विमानतळावरील सुरक्षा मशिन्स पूर्ववत सुरू

SCROLL FOR NEXT