Sharad Pawar
Sharad Pawar 
महाराष्ट्र

खातेवाटपात राष्ट्रवादीचा वरचष्मा; 'या' महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रिपद देताना राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक मंत्रिपदे पारड्यात पाडून घेण्यात यश मिळविले आहे. ४३ जणांच्या मंत्रिमंडळात या पक्षाला सर्वाधिक १६ मंत्रिपदे मिळाली आहेत. तसेच आज (रविवार) झालेल्या खातेवाटपातही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना प्रमुख खात्यांची जबाबदारी मिळाली आहे. 

अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाचाही पदभार आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह पंधरा मंत्रिपदे मिळाली आहेत. तर, काँग्रेसला बारा मंत्रिपदांवर समाधान मानावे लागले आहे. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेस पक्षाला देण्यात आले आहे. राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्रिपदासह ४३ मंत्रिपदे असतात.

महाविकास आघाडीतला शिवसेना हा सर्वांत मोठा पक्ष म्हणून त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे. मात्र, मंत्रिपदाच्या वाटपात ‘राष्ट्रवादी’ने १६ पदे मिळवली आहेत. २००४ मधे ‘राष्ट्रवादी’च्या जागा सर्वाधिक असताना काँग्रेसला मुख्यमंत्रिपद देण्यात आले होते. त्या बदल्यात महत्त्वाची कॅबिनेट मंत्रिपदे ‘राष्ट्रवादी’ने पदरात पाडून घेतली होती. त्याच धर्तीवर आता शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यात आल्याने अधिकची मंत्रिपदे ‘राष्ट्रवादी’ने पटकावली आहेत. त्यात महत्त्वाची खातीही मिळविली आहेत. 

‘राष्ट्रवादी’कडे उप-मुख्यमंत्रिपदासह गृह, अर्थ, जलसंपदा, सामजिक न्याय, अन्न व नागरि पुरवठा, अल्पसंख्यांक विकास, गृहनिर्माण, ग्रामविकास अशी महत्त्वाची खाती मिळविली आहेत. काँग्रेसला महसूल, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक बांधकाम अशी खाती मिळाली आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT