Nana Patole VS Nitin Raut e sakal
महाराष्ट्र बातम्या

नितीन राऊतांना खरंच बैठकीचं निमंत्रण नव्हतं का? पटोले म्हणतात...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) अंतर्गत गटबाजीमुळे नाराजीनाट्य सुरू असल्याचं समोर आलं आहे. आज मुंबईत काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील देखील उपस्थित होते. पण, ऊर्जामंत्री नितीन राऊतांना (Nitin Raut) बैठकीचं निमंत्रण दिलं नव्हतं, अशी चर्चा आहे. त्याबाबतच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी खुलासा केला आहे.

आज काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. यामध्ये मंत्रालयाबाबत कुठल्याही चर्चा नव्हत्या. त्यामुळे नितीन राऊत बैठीकाला अपेक्षित नव्हते. ते फक्त एच. के. पाटील यांना भेटायला आले होते. मंत्रालयात असलेल्या समस्या त्यांनी पाटील यांना सांगितल्या. तसेच कॅबिनेटची बैठक असल्यानं ते लगेच निघून गेले, असं नाना पटोले म्हणाले. बैठकीमध्ये कामगार मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांसोबत काँग्रेसचे बडे नेते या बैठकीला उपस्थित होते, असंही नाना पटोलेंनी सांगितलं.

बैठकीमध्ये येत्या महापालिका निवडणुकांचा आढावा घेण्यात आला. तसेच येत्या काही दिवसांत वर्कींग प्रेसिडेंट आणि सर्व मंत्र्यांना बोलावण्यात येणार आहे, असंही नानांनी सांगितलं. दरम्यान, नितीन राऊत खरंच नाराज आहेत का? असं विचारलं असता पटोले म्हणाले, ''नाराजी हा राजकारणाचा भाग आहे. त्यामुळे आम्ही फारसा विचार करत नाही. मंत्र्यांच्या खात्यात अडचणी असतील तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावी. त्याचा अर्थ पक्षामध्ये काहीतरी गडबड आहे, असं नाही.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Kalyan Crime : ६ महिन्यांपूर्वी लग्न केलेल्या २५ वर्षीय लेकीची हत्या, वडिलांवरच संशय; काय घडलं?

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

SCROLL FOR NEXT