SSC_HSC_Students 
महाराष्ट्र बातम्या

दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेबाबत प्रश्नचिन्ह कायम; विद्यार्थ्यांचे भवितव्य लागले टांगणीला!

मीनाक्षी गुरव

पुणे : दहावीच्या परीक्षेत अवघ्या काही गुणांनी अनुत्तीर्ण झालेला ओम (नाव बदललेले आहे) गेल्या काही दिवसांपासून  फेरपरीक्षा कधी होणार याच्या प्रतीक्षेत आहे. ही परीक्षा झाल्यास त्यासाठी पुन्हा जोमाने अभ्यास करता येईल आणि पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल, अशी त्याची अपेक्षा आहे. खरंतर दहावी-बारावीचा निकाल लागून दीड महिना उलटला, तरी अद्याप फेरपरीक्षेबाबत प्रश्नचिन्ह असल्याने ओमसारख्या लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ओम फेरपरीक्षा कधी होणार याबाबत चौकशी करण्यासाठी सातत्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालय फोन करत आहे. परंतु त्याला कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याचे त्याने 'सकाळ'शी बोलताना सांगतिले. राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या श्रेणीसुधार तसेच फेरपरीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. मात्र नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या परीक्षा होतील, याबाबतही अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याची माहिती समोर येत आहे.

दरवर्षी बारावीचा निकाल मे महिन्यात, तर दहावीचा निकाल जूनमध्ये जाहीर करण्यात येतो. त्यानंतर तत्काळ जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षा घेतली जात होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात नव्हते. परंतु यंदा कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे या परीक्षांचे निकाल उशिरा जाहीर झाले. त्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी,' राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता या परीक्षा आता दिवाळीनंतरच होतील, असे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या पुनर्परीक्षा लांबणीवर पडणार असल्याचे चित्र गायकवाड यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले. परंतु या फेरपरिक्षांबाबत आतापर्यंत तरी अनिश्चितता असल्यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण वाढत असल्याचे दिसून येते.

"दहावी-बारावीच्या फेरपरीक्षेबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या परीक्षांचे नियोजन सुरू आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल."
- डॉ. शकुंतला काळे, अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

दहावी-बारावीच्या (२०१९-२०) परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या :

इयत्ता परीक्षेला बसलेले विद्यार्थी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी
राज्यातील एकूण विद्यार्थी
- दहावी (नियमित विद्यार्थी)
१५,७५,१०३ १५,०१,१०५ ७३,९९८
दहावी (पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी) १,७९,२६४ १,३५,९९१ ४३,२७३

पुणे विभागातील विद्यार्थी

- दहावी (नियमित विद्यार्थी)

२,५७,००८ २,५०,१६८ ६,८४०
इयत्ता परीक्षेला बसलेले विद्यार्थी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी
बारावी (नियमित विद्यार्थी) १४, १३,६८७ १२,८१,७१२ १,३१,९७५
बारावी (पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी) ८३,३४१ ३३,७०३ ४९,६३८

(पुणे विभागातील विद्यार्थी)

- बारावी (नियमित विद्यार्थी)

२,४०,६९७ २,२२,६४६ १८,०५१

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT