या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात 36 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाई (सातारा) : केंजळ (ता. वाई) येथे विनापरवाना बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा रात्री स्थानिक प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आला. हा पुतळा सुरक्षितरीत्या सातारा येथील छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या (Chhatrapati Shivaji Museum) ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात (Bhuinj Police Station) 36 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उर्वरित संशयिताचा शोध घेत आहेत.
केंजळ ग्रामपंचायत (Kenjal Gram Panchayat) कार्यालयाच्या चौकात भैरवनाथ मंदिरालगत चबुतरा बांधून शुक्रवारी (ता. 11) मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा स्थापित केला. याबाबतची माहिती पोलीस व महसूल प्रशासनास मिळाली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक गणेश केंद्रे, तानाजी बुरडे, तहसीलदार रणजित भोसले, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे आदी अधिकाऱ्यांनी गावात धाव घेतली. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात गावातील ज्येष्ठ नागरीक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ज्यांनी पुतळा बसविला आहे, त्यांनी तो काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावा तसेच शासनाची परवानगी घेऊन पुन्हा सार्वजनिक ठिकाणी बसवावा, अशी सूचना केली. त्यावर काही ग्रामस्थ व युवकांनी पुतळा काढून घेण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण होते.
त्यानंतर दिवसभर ग्रामस्थ व युवकांची समजूत काढण्याचा प्रयत्न वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला. कोणीही ऐकत नसल्याचे दिसून आल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांची ज्यादा कुमुक मागविण्यात आली. सायंकाळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे खराडे हे गावात हजर झाले. त्यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, गावातील ज्येष्ठ नागरिकांशी पुन्हा चर्चा केली. सामोपचाराने मार्ग निघत नसल्याने पोलिसांनी ग्रामपंचायत चौकातून गावकऱ्यांना हटविले. त्यानंतर पोलिसांनी पुतळा हटविण्याचा निर्णय घेतला. रात्री उशिरा जेसिबी, ब्रेकरच्या साहाय्याने चबुतरा दूर करून पुतळा सुरक्षित काढण्यात आला. त्यानंतर हा पुतळा सुरक्षितरीत्या सातारा येथील छत्रपती शिवाजी संग्रहालयात नेण्यात आला. आज सकाळी गावात पोलिसांनी संचलन केले. दिवसभर गावात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
केंजळमध्ये अनधिकृतरीत्या पुतळा बसवून तणावाचे वातावरण केल्याप्रकरणी ३६ जणांवर भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी चार जणांना पोलीस कोठडी मिळाली आहे. अद्यापही गावात पोलीस बंदोबस्त तैनात असून तणावपूर्ण शांतता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.