Sandeep Kshirsagar
Sandeep Kshirsagar esakal
महाराष्ट्र

Gram Panchayat Election Result : जयदत्त क्षीरसागरांच्या होमग्राउंडवर पुतण्याचा दणदणीत विजय!

सकाळ डिजिटल टीम

जयदत्त क्षीरसागर यांचं होमग्राउंड असणाऱ्या राजुरीत आमदार क्षीरसागर यांच्या पॅनलचा मोठा विजय झालाय.

बीड : राज्यातील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत आहे. थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल जाहीर होत असून महाविकास आघाडीतील घटक पक्ष बाजी मारतात की सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकते याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

नवगण राजुरी म्हणजे, एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणाचं केंद्र. दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांच्यानंतर गावच्या व सर्कलच्या राजकारणाची सुत्रं त्यांचे पुत्र रवींद्र क्षीरसागर यांच्याकडं राहिली. पुढं काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व पुतणे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्यातील राजकीय ठिणगीनंतर तिसऱ्यांदा राजुरीकरांनी संदीप क्षीरसागर यांच्याच बाजूनं कल दिलाय.

ग्रामपंचायत निवडणूक निकालात मंगळवारी संदीप क्षीरसागर गटाच्या सरपंचपदासह सर्व सदस्यांनी एकतर्फी विजय मिळविला. जिल्ह्याच्या राजकारणावर एकेकाळी अधिराज्य असलेल्या दिवंगत लोकनेत्या केशरबाई क्षीरसागर यांची राजकीय कारकिर्द देखील नवगण राजुरीच्या (ता. बीड) सरपंच म्हणूनच सुरु झाली.

दिवंगत लोकनेत्या केशरबाई क्षीरसागर यांचे बीड तालुक्यातील नवगण राजुरी (Rajuri Gram Panchayat Election Result) हे बाजारपेठेचे व जिल्हा परिषद सर्कलचं गाव. त्यामुळं गावाला मोठे राजकीय महत्व आहे. गावच्या ग्रामपंचायतीवर बहुदा क्षीरसागरांचंच प्रभूत्व राहिलेलं आहे. दिवंगत केशरबाई क्षीरसागर देखील येथील सरपंच राहिल्या. त्यांच्यानंतर ग्रामपंचायतीची सत्ता कायम त्यांचं चिरंजीव रविंद्र क्षीरसागर यांच्या अधिपत्याखाली राहिली. त्यांच्यासह खुद्द त्यांच्या दिवंगत पत्नी व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आई रेखाताई क्षीरसागर यांनी देखील येथील सरपंचपद सांभाळलं. क्षीरसागर एकत्र असतानाही गावातील राजकीय विरोधकांनी त्यांना आव्हान दिलं आणि काही प्रमाणात राजकीय यश देखील मिळविलं. २०१६ पासून क्षीरसागरांत राजकीय दरी निर्माण झाली.

यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत गावातील मताधिक्य संदीप क्षीरसागर यांच्याच पारड्यात पडलं. नंतर ग्रामपंचायत निवडणुकीत देखील संदीप क्षीरसागर गटाच्याच पॅनलनं बाजी मारली. विधानसभा निवडणुकीत देखील तत्कालिन मंत्री व शिवसेनेचे बीड विधानसभा मतदार संघाचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्यापेक्षा राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनाच अधिक मतं मिळाली.

आता देखील ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आघाडीच्या विरोधात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पॅनल समोरासमोर होते. संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील स्वर्गीय काकू - नाना रेखाताई विचार राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीच्या मंजूषा बनकर यांच्यासह इतर सदस्यपदाचे उमेदवार विजयी झाले. तर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून नवगण परिवर्तन विकास आघाडीनं अंबिका लगड या सरपंचपदाच्या उमेदवारासह सदस्यांचा पराभव झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Tampering Case: वायकरांच्या मेहुण्यापाठोपाठ ठाकरे गटाचे आमदार देखील अडचणीत, फेरमतमोजणी प्रकरणी नवा ट्विस्ट

Latest Marathi Live Updates : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दोन प्रभारींची नियुक्ती; वैष्णव आणि यादव यांच्यावर जबाबदारी

T20 WC 2024 Super 8 Weather Forecast : वर्ल्ड कप जिंकण्याचे कर्णधार रोहितचे स्वप्न जाणार वाहून? 'सुपर-8'वर वरुणराजाची टांगती तलवार

New Zealand PMs: जपानला जाताना न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे विमान झालं खराब, मग असा पूर्ण केला प्रवास

Smartphone Tips : मोबाईल सर्व्हिस सेंटरला देताना करू नका 'या' चुका; होऊ शकतं मोठं नुकसान,जाणून घ्या

SCROLL FOR NEXT