Shambhuraj Desai MahaVikas Aghadi Government
Shambhuraj Desai MahaVikas Aghadi Government esakal
महाराष्ट्र

महाविकास आघाडीत इच्छा नसतानाही काही निर्णय घ्यावे लागले; देसाईंचा नेमका निशाणा कोणावर?

हेमंत पवार

'त्यावेळी आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आलेला नव्हता.'

कऱ्हाड (सातारा) : महाविकास आघाडी सरकारमध्ये (Maha Vikas Aghadi Government) आम्ही असताना काही निर्णय हे इच्छा नसतानाही अनिश्चेने घ्यावे लागले. मी अर्थराज्यमंत्री असूनही मला निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता. आमचं सरकार आल्यावर राज्याच्या हितासाठी काही निर्णय मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी बदलले, अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली.

मंत्री देसाई पुढं म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये मी गृहराज्यमंत्री, अर्थराज्यमंत्री होतो. त्यावेळी आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आलेला नव्हता. त्यामुळं काही निर्णय हे आम्ही मंत्री असतानाही अनिश्चेने घ्यावे लागले होते. त्यामध्ये राज्याचं हित नव्हतं. आमचं सरकार आल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काही निर्णय राज्याच्या हितासाठी बदलले आहेत. त्यामुळं त्यातून राज्याचा फायदाच होईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

चोरटी दारु रोखण्याचे आदेश

राज्याला उत्पादन मिळवून देणारे तिसऱ्या क्रमांचे उत्पादन शुल्क विभाग आहे, असं सांगून ते म्हणाले, माझ्याकडील विभागाने १८ हजार कोटी रुपयांचा निधी सरकारी तिजोरीत जमा केला आहे. कर चुकवेगिरी, बॉर्डरच्या जिल्ह्यातून होणारी चोरटी दारु वाहतूक रोखण्यासाठी नवीन आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यातून माझ्याकडील विभागाचे उत्पन्न वाढवण्याचा माझा प्रयत्न राहील, असंही देसाईंनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT