Shivsena-Sanjay-Raut 
महाराष्ट्र बातम्या

आमची खुर्ची बदलली, आता सरकारची खुर्ची जाणार : संजय राऊत

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून दररोज चर्चेत राहत आहेत. रविवारी (ता.17) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ते बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथे गेले होते.

त्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला. ''संसदेत आमची खुर्ची बदलली आहे, त्यामुळे आता आम्ही सरकारचीही खुर्ची बदलणार आहोत. सरकारने आमच्या खुर्च्या संसद भवनाबाहेर जरी ठेवल्या तरी आमचा विरोध यापुढेही सुरूच राहील. कारण आम्ही स्ट्रीट फायटर आहोत. सत्ता घेणारे आणि सत्ता देणारे तुम्ही कोण? असा सवाल संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला. 

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनादिवशीच शिवसेना 'एनडीए'तून बाहेर पडल्याची अधिकृत घोषणा संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली. त्यावर संजय राऊतांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, ''सेनेला एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण? शिवसेनेला एनडीएतून बाहेर काढणारा निर्णय लल्लू-पंजू घेऊ शकत नाहीत. एनडीए ही कोणा एका पक्षाच्या मालकीची नाही. उलट भाजपनंच शिवसेनेला विरोधी पक्षात ढकललं आहे. सेनेला एनडीएतून बाहेर काढण्याअगोदर जर त्यांनी आमच्यासोबत चर्चा केली असती, तर 'दूध का दूध, पानी का पानी' ते स्पष्ट झालं असतं. यावरूनच कोण खोटं बोलतंय ते दिसून येतं.'' 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएची बैठका घेतल्याची चर्चा आहे, याबाबत बोलताना ते म्हणाले, पंतप्रधान मोदींनी एनडीएच्या बैठका कधी घेतल्या हे माहित नाही. ते एनडीए प्रमुख आहेत का? अशी कोपरखळीही त्यांनी पंतप्रधानांना मारली आहे. 

राऊत पुढे म्हणाले, ''महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करणार आहे. यासाठी दिल्लीत आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत आहोत. यामुळे कुणाच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही. काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी मेहबूबा मुफ्तींसोबत हातमिळवणी करताना त्यांनी आम्हाला विचारलं नव्हतं. सध्या दिल्लीतील हवा अशुद्ध झाली आहे. आम्ही ती शुद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत.''

रविवारी सकाळी राऊत यांनी माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्र सोडले होते. फडणवीस यांनी स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र बाळासाहेबांनी आपणा सर्वांना दिला, अशा आशयाचे ट्विट केले. या ट्विटची दखल घेत शिवसेना नेते राऊत यांनीही त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले.

राऊत म्हणाले, ''उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना वचन दिले आहे. त्यानुसार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे शिवसेनेला कुणी स्वाभिमान शिकवू नये. बाळासाहेबांची शिकवण असणारे शिवसैनिक स्वाभिमान आणि हिंदुत्वाबद्दल योग्यवेळी उत्तर देतील.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

Blinkit-Zeptoवरून ५ किलोपेक्षा जास्त साखर मिळणार नाही! सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना झटका; Online खरेदीवर मर्यादा...

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

Mumbai Local: पार्किंगची फेररचना, नायगाव-भाईंदरमध्ये ३१ नव्या मार्गिका; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT