Uddhav Thackeray_Eknath Shinde
Uddhav Thackeray_Eknath Shinde 
महाराष्ट्र

"पंतप्रधानांनी सांगितलंय 40 गावं त्यांना द्या, POK तील 100 गावं तुम्हाला देऊ"; ठाकरेंचा CM शिंदेंना टोमणा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यात सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन बराच खल सुरु आहे. महाराष्ट्र सरकारनं नुकत्याचं सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी शासकीय सेवा-सुविधा जाहीर केल्या. यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीच्या जत तालुक्यातील ४० गावं कर्नाटकात सामिल होतील असं त्यांनी म्हटलं होतं. यावर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यपाल आणि सीमावादावर भाष्य केलं. (Uddhav Thackeray taunts On CM Eknath Shinde regarding Maharashtra Karnataka border issue)

बोम्मई यांच्या विधानावरुन त्यांनी भाजपला टार्गेट केलं आहे त्याच बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोमणाही मारला. उद्धव ठाकरे म्हणाले, "सध्या राज्यातील ईडी सरकारला मुख्यमंत्री आहे की नाही काही कळत नाही. कारण मुख्यमंत्री कधी बोलतच नाही. त्यांना विचारलं तर ते सांगतील की काळजी करु नका मी पंतप्रधानांना सांगितलं आहे, पंतप्रधान म्हणालेत की, त्यांनी ४० गावं घेतली तर घेऊ द्या आपण पाकव्याप्त काश्मीर जिंकल्यानंतर त्यातील १०० गावं महाराष्ट्राला देऊ, असंही ते सांगू शकतील"

भाजपचे नेते वरिष्ठांच्या मर्जीशिवाय काही बोलत नाहीत, म्हणून बोम्मई जे काही बोललेत ते त्यांच्या वरिष्ठांच्या परवानगीशिवाय बोललेत का? असा सवालही ठाकरेंनी यावेळी केला. भाजपचा महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न, महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याचा, महाराष्ट्राचे उद्योगंदे इतरत्र पळवून महाराष्ट्र कंगाल करण्याचा त्यांचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे का? याचं उत्तर भाजपनं दिलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

महाराष्ट्रातील बडे प्रकल्प नुकतेच गुजरातमध्ये गेल्यानं राज्यात मोठं वादंग उठलं होतं. यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी सडकून टीका केली. यावेळी पंतप्रधानांनी महाराष्ट्राला या प्रकल्पांपेक्षाही मोठे प्रकल्प देण्याचं आश्वासन दिल्याचं मुख्यमंत्र्यांसह इतर काही मंत्र्यांनी म्हटलं होतं. यावरुनच आता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना टोमणा मारला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT