Final_Year-Students
Final_Year-Students 
महाराष्ट्र

Breaking : महाविद्यालय स्तरावर होणार परीक्षा?; 'यूजीसी'चे उपाध्यक्ष काय म्हणाले पाहा!

ब्रिजमोहन पाटील

पुणे : 'कोरोना'मुळे परीक्षा होण्यास विलंब होत असल्याने विद्यापीठांवरील भार कमी करण्यासाठी चांगल्या महाविद्यालयांना त्यांच्या स्तरावर परीक्षा घेऊ दिल्या जाव्यात, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग विचार करत आहे. मात्र, परीक्षेशिवाय पदवी मान्य करणार नाही, असे यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.

राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा ऐच्छिक केल्या आहेत. यूजीसीने सप्टेंबर मध्ये परीक्षा घ्या असे आदेश विद्यापीठांना दिले आहेत. यामुळे नवा वाद निर्माण झाला. राज्य सरकारने 'यूजीसी'च्या आदेशाप्रमाणे परीक्षा घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामूळे राज्यात परीक्षा होणार का नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

याबाबत डॉ. भूषण पटवर्धन म्हणाले, 'यूजीसी'ने एप्रिल महिन्यातच परीक्षा कशी घ्याची मार्गदर्शक सूचना जाहीर केली आहे. जेवढा उशीर केला जाईल तेवढे परीक्षा घेणे अवघड होत आहे. त्यामुळे परीक्षा आयोजनासाठी आम्ही विद्यापीठांना पूर्ण स्वातंत्र्य दिले होते. 'यूजीसी'ही विद्यापीठाची सर्वोच्च संस्था आहे, त्यामुळे परीक्षा ही घ्यावी लागेल. परिक्षेविना विद्यार्थ्यांना दिलेल्या पदवी 'यूजीसी' स्वीकारणार नाही. चुकीच्या गुणपत्रिका घेऊन विद्यार्थ्यांना आयुष्यभर त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे परीक्षा ही झाली पाहिजे. 

विद्यापीठांवर परीक्षा घेताना ताण निर्माण होणार असल्याने महाविद्यालयांच्या स्तरावरच परीक्षा घेतली जावी याबाबत यूजीसी विचार करत आहे. तसेच परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये यासाठी स्थानिक शाळा, महाविद्यालयांचा वापर करता येऊ शकतो. 'कोरोना'मुळे अडचणी आहेत, पण मार्ग काढावा लागेल. 

शैक्षणिक वर्षात बदल होणार
अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलै महिन्यात पार पडल्या असत्या तर सप्टेंबरपासून प्रथम वर्षाचे अभ्यास वर्ग सुरू केले जाणार होते. मात्र आता परीक्षाच लांबली असल्याने शैक्षणिक वर्षाच्या वेळपत्रकात बदल होईल. सुधारित वेळपत्रकात जाहीर केले जाईल, असो पटवर्धन यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाराष्ट्राची बाजू मांडत आहे
इतर राज्यातील कोरोनाची माहिती घेत असताना त्यात महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे निदर्शनास आले. याबाबतीत ही मी महाराष्ट्राची भूमिका मांडत आहे, असे पटवर्धन यांनी सांगितले. दरम्यान, परीक्षेच्या मुद्द्यावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवर डॉ. भूषण पटवर्धन यांना महाराष्ट्राची बाजू मांडा अशी टीका केली होती.

(Edited by Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT