Actress Ratna Pathak Shah on Pathaan Controversy Google
मनोरंजन

Pathaan Controversy: 'म्हणून हे विष पेरायचं काम करतायत...', भगव्या बिकिनी वादात रत्ना पाठक यांची उडी

रत्ना पाठक सध्या त्यांच्या 'कच्छ एक्सप्रेस' या सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमावरनं होणारे वाद रत्ना पाठक यांना नवे नाहीत.

प्रणाली मोरे

Pathaan Controversy: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेत्री रत्ना पाठक शाह सध्या आपला गुजराती सिनेमा 'कच्छ एक्सप्रेस'मुळे चर्चेत आहेत. या सिनेमात 'तारे जमीं पर' फेम अभिनेता दर्शिल सफारी देखील मुख्य भूमिकेत आहे. याव्यतिरिक्त मानसी पारेख देखील या सिनेमात आहेत. रत्ना पाठक शाहने आपल्या या सिनेमाविषयी बातचीत करताना बॉलीवूडच्या गोल्डन एरामधील सिनेमांच्या वादावर देखील स्पष्ट भाष्य केलं आहे.(Actress Ratna Pathak Shah on Pathaan Controversy)

रत्ना पाठक यांनी आजपर्यंत साकारलेल्या जवळपास सर्वच भूमिका नेहमी महिला सक्षमीकरणावर भाष्य करताना दिसल्या आहेत. रत्ना पाठक म्हणाल्या,''मी अशा स्क्रिप्ट निवडते ज्यात मला स्वतःला पहायला आवडेल. मला सामाजिक भान जपायला आवडतं. कारण मला माहितीय त्याच्याशिवाय कलेचं महत्त्व नसतं. इतरही गोष्टी महत्त्वाच्या आहेत,ज्यातनं मनोरंजन होतं पण सामाजिक मूल्य कलेच्या माध्यमातून जपता आली पाहिजेत. मला आधी जे केलंय तेच तेच पून्हा करण्यात फार रस नसतो. आधी झालं ते सगळं ग्रेट होतं आणि त्याच धर्तीवर जे सिनेमे बनतात अशा सिनेमात सतत काम करणं मला आवडत नाही. मग मला उपाशी रहायची वेळ आली तरी चालेल,मी ते सिनेमे नाही करणार''.

रत्ना पाठक पुढे म्हणाल्या,''मला वाटतं आपण आज जिथे आहोत त्याच्या पुढचा विचार करायला हवा. जे आधी झालं,त्याच्या आधारानं आपण काम करत आहोत यात माझं दुमत नाही. पण हे जे लोक बोलतायत गोल्डन एरा...सिनेमांचा सुवर्णकाळ हे जरा अतीच होतंय. किती दिवस ते कुरवाळत बसणार आपण. माझी मावशी तर बोलायची भारताचा सुवर्णकाळ अजून यायचा आहे. त्यामुळे मी देखील हेच योग्य आहे असं मानते. आधी जे होऊन गेलं त्याला आपण सुवर्णकाळ म्हणूच शकत नाही. ज्या समाजात स्त्रियांना बंधनात बांधून ठेवलं जातं तो सुवर्णकाळ कसा असू शकतो. त्यामुळे मी तरी त्या सुवर्णकाळाची वाट पाहतेय''.रत्ना पाठक यांनी सिनेमांवरनं होणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या वादांवर भाष्य केलं.

पठाण वादावर बोलताना त्या म्हणाल्या, ''माझा एका सिनेमा आला होता,'लिपस्टिक माय बुर्का', तेव्हा तर खूप तमाशा झाला होता. स्त्री केंद्रित सिनेमा होता म्हणून त्यावर बंदी आणण्याचा सूर उमटला होता. मला तेव्हा काहीच कळत नव्हतं..पण या सगळ्या गोष्टी होत राहतात,समाजाची विचारधारणा बदलायला खूप वेळ लागतो..आणि यात खूप गोष्टी न समजतील अशा घडत असतात. समुद्र मंथनाची कथा आपण सगळ्यांनी ऐकली असेल,त्यातनं अमृत बाहेर येतं तसं विष देखील बाहेर फेकलं जातं. कोणी तरी शिवा हवाच त्याला प्राशन करण्यासाठी. आपल्याकडे आज शिवा नाही,यामुळे हे लोक विष थुंकतायत इकडे-तिकडे. पण एक दिवस तो शिवा देखील येईल आणि त्याच्या सोबतीनं आपण सगळे शिवा बनू..आणि या विषाला पचवून आपण पुढे जाऊ''.

पुढे रत्ना पाठक म्हणाल्या,''जर सिनेमांची समिक्षा करत त्यात काय कमी आहे यावर चर्चा होत असेल तर ती झालीच पाहिजे. आपल्याकडे कुणी समिक्षक नाहीय. अर्ध्याहून अधिक मीडिया तर समिक्षा करतच नाही. सिनेमाचं तरी ठीक पण नाटकाची समिक्षा होताना दिसतच नाही. आपण क्रिटिसिझमला घाबरतो. भारतात ही एक अडचण आहे. या अशा वातावरणात निर्मिती करणं कठीण होऊन बसलं आहे.निर्मात्यांसाठी हा काळ खूप कठीण आहे. प्रत्येक गोष्टीत कायदा आणावा लागतो. कारण कधी कोण नाराज होईल हे सांगता यायचं नाही. ही ती जागा नाही राहिली जिथे कलेची निर्मिती केली जाईल. सिनेमे बनतील. पैसा पण येईल पण चांगलं काम करणं कठीण होऊन बसेल...शेवटी कधी कुठून कोणाचा विरोध येईल याचं दडपण कायम राहिल''.

रत्ना पाठक यांचा 'कच्छ एक्सप्रेस' सिनेमा ६ जानेवारीला रिलीज होत आहे. या सिनेमा संदर्भात त्यांच्या गुजराती चाहत्यांमध्ये भलताच उत्साह पहायला मिळत आहे. सासू-सूनेच्या या सुंदर कथेतून एक सामाजिक संदेशही देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लक्ष्मीकांत बेर्डेंनी गाजवलेलं नाटक परत येणार; 'अबब विठोबा बोलू लागला’ मध्ये हास्यजत्रेतील अभिनेता साकारणार धम्माल पुजारी

Building Collapsed: मोठी घटना! तीन मजली घराचा भाग कोसळून दुर्घटना; एकाचा मृत्यू, ११ कामगार ढिगाऱ्याखाली दबले

Thane Politics: राजकारण तापले! भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षत्याग, संतप्त कार्यकर्त्यांकडून फोटोला शाई फासून निषेध

Aishwarya Rai Bachchan and PM Modi VIDEO : पंतप्रधान मोदींना बघताच ऐश्वर्याने भर स्टेजवर केली अशी काही कृती, की पाहणारेही पाहातच राहिले

Latest Marathi Breaking News Live Update: लासलगाव बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात मक्याची आवक

SCROLL FOR NEXT