salman and abhinav kashyap 
मनोरंजन

सुशांतच्या आत्महत्येनंतर दिग्दर्शकाने केला सलमानवर आरोप, बॉलिवूडमध्ये नव्या #Meetoo ची सुरुवात?

सकाळ वृत्तसेवा

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर नैराश्यावर जितकी चर्चा झाली त्याहून अधिक आता फिल्म इंडस्ट्रीमधील एक वेगळी बाजूच समोर येत आहे. करण जोहरने आपण सुशांतला फोन करू शकलो नाही याबाबत स्व:ताला दोष दिला. पण त्यानंतर कंगना राणावत, निखिल द्विवेदी, बबिता फोगट यांनी फिल्म इंडस्ट्रीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यातच आता दबंग चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव सिंग कश्यप यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये खळबळजनक आरोप केले आहेत. अभिनव यांनी म्हटलं की, वायआरएफ सारख्या संस्था कलाकाराचे करिअर बनवत नाहीत तर बिघडवतात. तसंच या पोस्टला पोलिस स्टेटमेंट म्हटलं तरी चालेल असंही लिहिलं आहे.

सुशांतच्या आत्महत्येनं फिल्म इंडस्ट्रीतील मोठी समस्या समोर आली आहे. ज्याच्याशी जवळपास सगळेच लढत आहेत. प्रत्यक्षात असं कोणतं कारण असू शकतं की कोणाला आत्महत्या करण्यासाठी मजबूर व्हावं लागेल? मला भीती आहे त्याच्या मृत्यूनंतर #metoo सारखी मोठी चळवळ सुरु होईल. बॉलिवूडमध्ये भेदभाव, ठराविक लोकांचे वर्चस्व, फिल्म इंडस्ट्रीतील, इंडस्ट्रीच्या बाहेरचा, मोठ्या कुटुंबातील, कोणी गॉडफादर असलेला तर कोणी अभिनयाच्या जोरावर आलेला अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कंगना राणावत, कोएना मित्रा, अनुभव सिन्हा, निखिल द्विवेदी, सपना मोती भवनावनी, बबिता फोगट यांच्यासारख्या अनेकांनी प्रश्न विचारले आहेत.

अभिनव कश्यप यांनी म्हटलं की, बहुतेक YRF एजन्सीने सुशांत सिंगला हे पाऊल उचलायला भाग पाडलं आहे. या प्रकरणाची अशा अँगलने चौकशी व्हायला हवी. या संस्था कलाकाराचे करिअर बनवत नाहीत तर बिघडवतात. मी बऱ्याच काळापासून हे भोगलं आहे. हे न बोलता कोड ऑफ कंडक्ट आहे. अशा संस्था कलाकारासोबत करार केल्यानंतर मनमानी कारभार करतात. 

दबंग चित्रपटाच्यावेळी आलेला अनुभव अभिनव यांनी शेअर केला आहे. यात त्यांनी म्हटलं की, दबंग चित्रपट निर्मितीवेळी माझ्याशी असंच झालं. अरबाज खान, सोहेल खान आणि त्यांचे कुटुंब मला धमकी देत होते. एवढंच नाही तर माझं करिअरही कंट्रोल करायचं होतं. अरबाजने यानंतर माझ्या दुसऱ्या चित्रपटाचं कामही काढून घेतलं होतं. यामुळे माझं नुकसान झालं आणि दबंग रिलिज करताना मला चुकीचं ठरवून प्रसिद्धी केली गेली. 

अभिनव कश्यप म्हणाले की, माझ्या वैयक्तिक आयुष्यात बरेच चढ उतार झाले आणि एवढ्यावरच थांबलं नाही. मला वेगवेगळ्या नंबरवरून धमक्याही दिल्या गेल्या. तेव्हा मी पोलिसांत तक्रार दिली होती. सुशांतच्या आत्महत्येनंतर आता या लोकांना समोर आणणं गरजेचं आहे जे मनमानी कारभार करून कलाकारांशी असं वागतात. या लोकांमध्ये सर्वात वर सलमान खान असल्याचा आरोपही अभिनव यांनी केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishwas Patil: मराठी साहित्याचा ऱ्हास थांबवा: अध्यक्ष विश्वास पाटील; अन्यथा खूप वाईट दिवस नेमकं काय म्हणाले?

Yearly Numerology 2026: मूलांक 1 आणि 5 साठी 2026 ठरणार शुभ; राहील सूर्याची विशेष कृपा, वाचा अंकज्योतिषनुसार तुमचे वार्षिक राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - 01 जानेवारी 2026

Morning Breakfast Recipe: नवीन वर्षाची हेल्दी सुरुवात! पहिल्याच दिवशी नाश्त्यात बनवा पौष्टिक पराठा, रेसिपी आहे खूपच सोपी

ढिंग टांग - नवे संकल्प : एक (नुसतेच) चिंतन..!

SCROLL FOR NEXT