KBC14: Amitabh Bachchan says men should never argue with their wives.  Google
मनोरंजन

KBC14: केबीसीच्या मंचावरनं अमिताभचा विवाहीत पुरुषांना खास सल्ला; म्हणाले,'बायकोच्या बाबतीत कधीच...'

अमिताभ बच्चन यंदाच्या केबीसीच्या १४ व्या सिझनमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी अन् करिअर विषयी अनेक खुलासे करताना दिसत आहेत.

प्रणाली मोरे

KBC14: 'कौन बनेगा करोडपती' शो प्रेक्षकांच्या आवडत्या रिअॅलिटी शो पैकी एक. याचा १४ वा सीझन सध्या सुरू आहे. अमिताभ बच्चन या शो मध्ये अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी आणि करिअर संदर्भात अनेक गोष्टींचा खुलासा करताना दिसतात. शो च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात त्यांनी एका स्पर्धकाला एक खास सल्ला देताना पाहिलं गेलं आणि लगोलग त्याची चर्चा सुरू झाली. (KBC14: Amitabh Bachchan says men should never argue with their wives.)

बिरेन नावाच्या स्पर्धकाला बिग बी यांनी हा सल्ला दिला आहे. त्याचं झालं असं की, बिरेननं अमिताभना सांगितलं की त्यांनी आपल्या पत्नीसमोर एक अट ठेवली होती की जर का अमिताभ यांच्यासमोर हॉट सीटवर बसायची संधी त्यांना मिळाली तर पत्नीला ते म्हणतील तसं जेवण बनवावं लागेल. पण जर असं झालं नाही तर पत्नी जे बनवेल ते मुकाटपणे खाईन. बिरेन यांनी शो मध्ये ३ लाख २० हजार रुपये जिंकले. आणि सोबत पत्नीसमोर जी अट ठेवली होती ती देखील ते जिंकले. बिरेन यांनी त्यावेळी अमिताभना त्यांचीच पत्नी जया बच्चन यांचा व्हिडीओ दाखवला आणि यावरनं पुढचं सगळं रामायण घडलं.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

गेल्या वर्षीचा केबीसी मधलाच तो व्हिडीओ होता. यात जया बच्चन सोबत श्वेता बच्चन आणि त्यांची मुलगी नव्या नंदा देखील होती. श्वेता आणि नव्या शो मध्ये पाहुण्या बनून आल्या होत्या. तेव्हा जया बच्चन यांनी एक व्हिडीओ मेसेज पाठवला होता. जया बच्चन यांचा व्हिडीओ पाहिल्यावर अमिताभ म्हणाले, ''सर ,पत्नीच्या बाबतीत जास्त अडून राहिलं नाही पाहिजे. जी ती म्हणेल ते गुपचूप ऐकून घ्यायला हवं''.

पुढे अमिताभ म्हणाले, ''ना मिले बैंगन,ना मिले भेंडी,या कोई आलू कोई बात नही....तुमच्यापेक्षा अधिक तुमची पत्नी तिच्या मुलासाठी काय योग्य हे एकआई म्हणून पाहत असते. त्याची जास्त काळजी घेताना दिसते. तिचं नेहमी आपल्या मुलावर,त्याच्या कुटुंबावर बारीक लक्ष असतं. त्यांच्यासाठी काय योग्य याचा ती विचार करत असते''. अमिताभच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशलवर व्हायरल झाला अन् लगोलग त्याची चर्चा सुरू झाली.

७ ऑगस्ट २०२२ रोजी 'कौन बनेगा करोडपती'चा १४ वा सिझन सुरु झाला होता. या शो मध्ये यंदाच्या सिझनला आतापर्यंत आमिर खान, मेरी कॉम, सुनील छेत्री पाहुणे म्हणून हजेरी लावून गेलेयत. याव्यतिरिक्त इतरही अनेक सेलिब्रिटींनी शो मध्ये उपस्थिती दर्शवली होती. २००० सालापासून सुरु झालेला केबीसी हा गेम शो गेली अनेक वर्ष आपलं राज्य कायम राखून आहे टी.व्ही च्या जगात.

अमिताभ यांच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर अमिताभ बच्चन यांना नुकतंच आपण 'ऊंचाई' सिनेमात पाहिलं. या सिनेमात त्यांच्यासोबत नीना गुप्ता,अनुपम खेर, बोमन ईराणी आणि डॅनी होते. दिग्दर्शक सूरज बडजात्या यांच्या या सिनेमाला बऱ्यापैकी प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT