corona1.jpg 
मराठवाडा

Coronavirus : उस्मानाबाद जिल्ह्यात २९ हजार जणांना कोरोनाचा धोका?

सयाजी शेळके

उस्मानाबाद : कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करावे की नको अशा द्विधावस्थेत असलेल्या प्रशासनाने आता दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांची सर्वेक्षण सुरू केले आहे. आतापर्यंत तब्बल २९ हजार नागरिक विविध आजाराने ग्रासले असल्याने त्यांची वेगळी काळजी घेऊन कामकाज सुरूच ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाच्या संसर्गाला नियंत्रीत ठेवण्यासाठी लॉकडाऊन करा, अशी आग्रही मागणी एका वर्गातून होत आहे. तर दुसरीकडे आमच्या रोजगाराचे काय, असे म्हणत लॉकडाऊन करू नये, असे म्हणणारा दुसरा वर्ग आहे. या दोन्हीमध्ये प्रशासनाची मात्र चांगलीच अडचण होत आहे. कोणाताही निर्णय घेतला तरी अवघड असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. त्यासाठी प्रशासनाने आता यातून मध्यम मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. कोरोनाच्या संसर्गाला दुर्धर आजार असणारे नागरिक बळी पडत आहेत. त्यासाठी या नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे.

२९ हजार दुर्धर आजाराने ग्रासलेत
जिल्ह्यातील अशा नागरिकांची यादी करण्याचे काम सुरू झाले आहे. अशा नागरिकांना वेगळे करून त्यांची खास काळजी घेतली जाणार आहे. शनिवारपर्यंत (ता. १२) झालेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात सर्वाधिक सहा हजार ११५ रुग्ण आहेत. त्यानंतर कळंब पाच हजार २२४, उमरगा चार हजार ८९२, उस्मानाबाद चार हजार १५३, परंडा तीन हजार ९५०, भूम दोन हजार ६११, वाशी एक हजार ५२३ तर लोहाऱ्यात एक हजार ३५२ रुग्ण असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहेत.

हायपरटेन्शनचे सर्वाधिक रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत २९ हजार ८२० दुर्धर आजार असणाऱ्यांची नोदंणी झाली आहे. यामध्ये हायपरटेन्शनचे सर्वाधिक सात हजार ९०७ रुग्ण आहेत. तर मधुमेहाचे सहा हजार ७३२, मुधमेह आणि हायपरटेन्शन असणारे दोन हजार ६८०, हदयविकार असणारे दोन हजार ६०९, अस्थमा असणारे एक हजार ८८३ याशिवाय कर्करोग, एचआयव्ही असणाऱ्या रुग्णांची सख्याही मोठी आहे. त्यामुळे यापुढेही हायपरटेन्शनचे रुग्ण वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

दुर्धर आजाराने ग्रासलेल्या नागरिकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. किंबहुना अशा रुग्णांमुळेच कोरोनाचा संसर्ग होऊन बळी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यासाठी त्यांना  वेगळे ठेवणे. त्यांची वेगळीच काळजी घेणे. त्यांना कोरोनाच्या संसर्गापासून कसे वेगळे ठेवता येईल, यासाठी त्यांच्या घरातील व्यक्तींना मार्गदर्शन करणे. असे प्रयोग राबविले जाणार आहेत.
 दिपा मुधोळ-मुंढे, जिल्हाधिकारी, उस्मानाबाद.

संपादन : प्रताप अवचार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT