Abdul Sattar Google
छत्रपती संभाजीनगर

....हा तर राजकीय मोर्चा, अब्दुल सत्तारांची फडणवीसांवर टीका

भारतीय जनता पक्षाच्या वतीने औरंगाबाद येथे जल आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : स्वतः पाच वर्ष मुख्यमंत्री होते. तरी औरंगाबादचा पाणीप्रश्न सुटला नाही, असा सवाल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. आज सोमवारी (ता.२३) भारतीय जनता पक्षाच्या वतीने औरंगाबाद (Aurangabad) येथे जल आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाचा समाचार प्रसारमाध्यमांशी बोलताना सत्तार यांनी घेतला. पुढे ते म्हणाले, पाच वर्षे राज्यात आणि केंद्रात सत्ता होती. त्यावेळी पाण्याची आठवण आली नाही का? (Abdul Sattar Says, Jal Akrosh Morcha Of Devendra Fadnavis In Aurangabad Is Political Driven)

हा पाण्याचा मोर्चा नाही. तो राजकीय मोर्चा आहे, असा टोला अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुका आल्या म्हणून मोर्चा काढला जात असल्याचा आरोप त्यांनी भाजपच्या जल आक्रोश मोर्चावर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून आक्रोश मोर्चाची तयारी जोरात सुरु होती. या मोर्चावर शिवसेनासह एमआयएमकडून टीका केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT