Aurangabad mahapalika.jpg 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादकरांनो सावधान ! विनामास्क महापालिकेत आलात तर भरावा लागेल एवढा दंड ! 

माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. असे असताना शहरातील नागरिक मात्र गांभीर्याने घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांच्या विरोधात महापालिका व पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे; तसेच महापालिका मुख्यालयात कोणी विनामास्क आले तर त्याला पाचशे रुपये दंड लावण्याचे आदेश प्रशासकांनी काढले आहेत. शुक्रवारपासून (ता.११) या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर एवढेच सध्यातरी पर्याय उपलब्ध आहेत. त्यानुसार शासन, प्रशासन वारंवार आवाहन करत आहे, नागरिक मात्र मनावर घेण्यास तयार नाहीत. लॉकडाउन शिथिल झाल्यापासून शहरात राजरोसपणे नागरिक मास्क न लावता फिरत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा प्रशासनाने नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी सुरू केली आहे. 

दरम्यान, प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत आणि टप्पा क्रमांक-३ या इमारतींत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनी विनामास्क प्रवेश करू नये, अन्यथा ५०० रुपये दंड लावला जाईल, असा इशारा दिला आहे.

तसेच दोन्ही इमारतींच्या प्रवेशद्वारावर थर्मलगन आणि ऑक्सिमीटरद्वारे तपासणी केल्याशिवाय प्रवेश करू नये, असे आवाहन पालिकेने केले आहे. थर्मलगन-ऑक्सिमीटरने तपासणी न करता कोणी महापालिकेत आले तर गस्तीवर असणाऱ्या माजी सैनिकांनी त्यांच्याकडून ५०० रुपये दंड वसूल करावेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 
 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT