Load_Shedding_h.jpg 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल साडेबाराशे शाळांची बत्ती गूल 

संदीप लांडगे

औरंगाबाद : कोरोना लॉकडाऊनमुळे मागील आठ महिन्यांपासून शाळा बंद आहेत. शाळा कधी सुरु होतील याबाबत अद्याप अनिश्‍चितता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल १ हजार २४३ शाळांचे विजबील थकले आहे. बंद शाळेत विजेचा वापर होत नसताना महावितरण कंपनीकडून मात्र बिले वसुली सुरु आहे. त्यामुळे थकबाकी असलेल्या शाळांचा महावितरणकडून वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. 

जिल्हा परीषदेने शाळेचे वीजबील भरण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना दिल्या होत्या. मात्र, जिल्ह्यातील अनेक शाळांचे वीजबील ग्रामपंचायतींनी भरले नाही. त्यामुळे ज्या शाळांचे वीजबील थकले आहे. अशा शाळांचे वीजबील महावितरण कंपनीकडून तोडण्यात आली आहे. यामध्ये जिल्हापरीषद, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यीत अशा एकूण एक हजार २४३ शाळांचा समावेश आहे. यापैकी बाराशे शाळा या ग्रामीण भागातील आहत. वीजपुरवठा खंडीत केलेल्या बाराशे शाळांपैकी कन्नड तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ५५२ शाळा आहेत. एक हजार २४३ शाळांची एकूण एक कोटी ४७ लाख ९५ हजार ५८५ रुपये थकबाकी शिल्लक आहे. 

डिजिटल साहित्य धूळखात 
जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व लोकसहभागातून जिल्ह्यातील बहुतांश शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. अनेक शाळांमध्ये एलसीडी, संगणक, सेटटॉप बॉक्स असे ई-लर्निंगचे साहित्य आहे. तब्बल आठ महिन्यांपासून शाळा बंद असल्यामुळे डिजिटल व ई-लर्निंग साहित्य धूळखात पडून आहे. हे साहित्य वापरात नसल्यामुळे नादुरुस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक शाळेत दोन किंवा त्यापेक्षा अधिक संगणक व ई-लर्निंग साहित्य आहे. बंद असल्यामुळे उंदीर व घुशींमुळे देखील या साहित्यांचे नुकसान होण्याची भीती शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

दरवर्षी शासनाकडून शाळांना निधी देण्यात येतो. मात्र, दिवसेंदिवस या निधीमध्ये कपात केली जात आहे. या निधीतून वर्षभर शाळेसाठी लागणाऱ्या शैक्षणिक साहित्यांची खरेदी केली जाते. त्यासाठी हा निधी कमी पडतो. त्यामुळे शासनाने शाळेचे वीजबील भरण्यासाठी स्वतंत्र निधी द्यावा. 
-रणजीत राठोड, शिक्षक समिती 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT