0000Dhangar.jpg 
छत्रपती संभाजीनगर

धनगर आरक्षणासाठी २२ ऑक्टोंबरला औरंगाबाद ते जालना 'मानवी साखळी'

संदीप लांडगे

औरंगाबाद : घटनेतील अनुसूचित जमातीच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर असलेली ‘धनगड’ हीच महाराष्ट्रातील धनगर जमात असल्याचे केंद्र व राज्य सरकारच्या अनेक दस्ताऐवजातून सिद्ध झाले आहे. परंतू शासनाच्या उदासिनतेमुळे ६५ वर्षापासून धनगर समाज अधिकारापासून वंचित आहे. या अधिकारासाठी गुरुवारी (ता.२२) औरंगाबाद ते जालना मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांनी पत्रकार परीषदेत दिली.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
यावेळी शेवाळे म्हणाले, की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण देणार अशा वल्गना करुन समाजाला धोका दिला. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी एक दिवसाचे स्वतंत्र अधिवेशन घेऊन धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्यावे, अशी मागणी केली होती. परंतू, आता त्यांचे सरकार सत्तेवर असल्याने आरक्षणाबाबतचा ठराव तातडीने मंत्रीमंडळात घेऊन तसा अभिप्राय केंद्र सरकारकडे पाठवावा. 

या मागणीसाठी गुरुवारी सकाळी अकरा वाजता फलोत्पादन व रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांच्या सुतगिरणी चौकातील निवास स्थानापासून ते केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन नाका, जालना येथील घरापर्यंत तब्बल ६० किलोमीटरची धनगर आरक्षण मानवी साखळी तयार केली जाईल. त्यात आरक्षण आंदोलनाचे रणशिंग फुंकणार आहे. याच दिवशी राज्याच्या इतर जिल्ह्यातील धनगर समाज अर्ध जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे लहु शेवाळे यांनी सांगीतले. यावेळी धनगर आरक्षण अॅक्शन कमिटीचे समन्वयक विठ्ठलराव खडके, काशीनाथ आरगडे, नाना साबळे, सोन्याबापू गावडे, दिगंबर खंडागळे, विठ्ठल कोरडे आदींची उपस्थिती होती. 

(Edited By Pratap Awachar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : ठाकरे मेळाव्यावर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT