आमदार संभाजी पाटील निलंगेकर 
छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यातील सून चालते, जावयाला का आढेवेढे 

मधुकर कांबळे

औरंगाबाद -  मराठवाड्यातील मुलींना सून म्हणुन प्राधान्य देण्यासाठी राज्याच्या इतर भागातील लोक तयार होतात. मात्र मराठवाड्यात सून म्हणून स्वत:ची मुलगी देण्यासाठी कोणी प्राधान्य देत नाहीत हे चित्र बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे प्रतिपादन माजी मंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षातील आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले. 

कलाग्रामच्या मैदानावर मराठवाडा असोशिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज ऍण्ड ऍग्रिकल्चर (मसिआ) च्यावतीने ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो 2020 निमित्त शनीवारी (ता.11) " युवा नेतृत्व उद्योजकता आणि मराठवाड्याचा विकास ' या विषयावर त्यांची मुलाखत झाली, यावेळी ते बोलत होते. 

एका प्रश्नाच्या उत्तरात पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळाशी संबंधित एका वधू वर सूचक केंद्रचालकाच्या अनुभवाच्या अनुषंगाने आमदार संभाजी पाटील म्हणाले, मराठवाड्यातील मुली कुटूंबाला एकत्र बांधून ठेवतात, अडचणीच्या वेळी संपूर्ण ताकदीने कुटूंबामागे उभे राहण्याची त्यांच्यात क्षमता आहे म्हणुन मराठवाड्यातील मुलगी सून म्हणून प्राधान्य देणारे खूप जण आहेत.

 मात्र सततचा दुष्काळ, रोजगाराचा आणि पाण्याचा प्रश्न यामुळे मराठवाड्यात सून म्हणून आपली मुलगी देण्यास प्राधान्य देणारे फार कमी आहेत हा वधू वर सूचक केंद्र चालकाचा अनुभव सांगून हे चित्र बदलण्यासाठी, मराठवाड्यातील मुलगी सून म्हणून स्विकारण्याला जसे प्राधान्य दिले जाते तसे मराठवाड्यात भविष्यात मुलगी देण्यालाही प्राधान्य दिले जाईल अशी मराठवाड्यात परस्थिती निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करू या असे मत व्यक्‍त केले. 

आपण नेहमी मराठवाड्यातील उद्योजकाची चर्चा करतो, मात्र पाण्याचे काय , पाणी असेल तरच उद्योग येतील आणि टिकतील. मराठवाड्याच्या नद्या एकमेकांना जोडणे म्हणजे चार उपाशी लोकांना एकत्र आणण्यासारखे आहे. जोपर्यंत पश्‍चिमी वाहीनी नद्यांचे पाणी मराठवाड्यातील नद्यांमध्ये खेळवले जात नाही तो पर्यंत मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही. तो पर्यंत विकास होणार नाही.

पाणी नसेल तर उद्योग बंद करावे लागतील की काय अशी परिस्थिती निर्माण होते. मुख्यमंत्र्याच्या शुक्रवारी (ता.10) झालेल्या बैठकीत देखील यावर चर्चा झाली. मात्र हा प्रश्‍न वेगाने सोडवण्यासाठी सगळ्यांना एकत्र यायला हवे असे मत संभाजी पाटील यांनी व्यक्त केले. 

मराठवाड्यात उद्योग उभा राहीला पाहीजे. तरुणांना रोजगार मिळला पाहीजेत. काळानुरुप काही गोष्टीत बदल झाला पाहीजे, तंत्रज्ञानामध्ये बदल झाले तरच उद्योग वाढू शकतील. आधीच्या लोकांनी काही केले असे नाही त्यांनीही काळानुसार बरेच बदल केले आहेत. आपल्यालाही काही बदल करावे लागतील आणि नव्या पिढीला बरेच काही द्यावे लागले. प्रत्येक लोकप्रतिनिधी मंत्री होताना त्या माध्यमातून आपल्या भागात काय सुधारणा करता येवू शकतात याचा विचार करतात. पर्यटनात चांगल्या संधी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. आदित्य ठाकरे हे नवे पर्यटनमंत्री यांना माझ्या सदीच्छा आहेत. नव्या सरकारमध्ये बरेच बदल होतील अशी अपेक्षा आमदार श्री. पाटील यांनी व्यक्‍त केली. यावेळी प्रदर्शनाचे समन्वयक सुनिल किर्दक यांनी त्यांना प्रश्न विचारत बोलते केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोनं स्वस्त! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; उच्चांकापेक्षा ₹27 हजारांनी कमी, पाहा आजचा भाव

Jalgaon Crime : जळगाव हादरलं! गणपतीच्या तयारीदरम्यान सैनिकाच्या पत्नीनं 5 वर्षांच्या चिमुरड्यासह पंख्याला ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास

ना भडक लूक ना अतिशयोक्ती; कतरिना-विकीने साधेपणा नेटकऱ्यांना भावला, Viral Video

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

आशिया कपची ट्रॉफी जिंकली, पण टीम इंडियाची ‘ही’ कमकुवत बाजू आली समोर; ५ सामन्यांत १३ झेल सोडले, मुझुमदार म्हणाले- सुधारण्यासाठी मेहनत सुरू

SCROLL FOR NEXT