jaysingrav.jpg
jaysingrav.jpg 
छत्रपती संभाजीनगर

बहूजनांचे राजकारण संपविण्याचा भाजपचा डाव : जयसिंगराव गायकवाड यांची टिका

मनोज साखरे

औरंगाबाद : भाजपमध्ये जीवघेणी स्पर्धा आहे. तेथे प्रत्येकाला प्रत्येकाची भीती वाटते. ‘युज अॅन्ड थ्रो’ हा त्यांचा विचार आहे. पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, विनोद तावडे, एकनाथ खडसे स्पर्धक होते म्हणुन त्यांना डावलले. मी कसलाच दावेदार नव्हतो तरी माझी फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना भीती वाटत होती. बहुजनांचे राजकारण संपविण्याचा डाव ते करीत आहेत. असा आरोप भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी आज (ता. २९) औरंगाबादेत केला.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
ते म्हणाले, ‘‘रावसाहेब दानवेंना पक्षात दाबले जाते. खडसेंना पक्षात मातीमोल केले, पंकजा मुंडे यांचे आज काय हाल आहेत याचा विचार करा. ही बहूजन समाजाची माणसे आहेत. त्यांचा मतदार संघासी संपर्क होऊ दिला जात नाही, दहा दहा वर्षे पुढचा कट भाजपमध्ये केला जातो. पक्षाची सामुहिक निर्णयप्रक्रीया फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी विडा उचलुन संपविली. ‘त्या’ दोघांचीच मनमानी पक्षात असते. त्यांच्या मर्जीनेच पद दिले जाते. पक्षात कुणाचेच ते ऐकत नाही, त्यामुळे हजारो कार्यकर्तेही दुरावत आहेत. भाजपची छापील घटना त्यांनी पायदळी तूडविली. एकही कामे धड नाही, सामुहिक मत नाही. त्यामुळे मी पुर्ण विचार करुन, मानसिकता तपासुन पक्ष सोडला. 

संघाला ‘रामराम’ 
आणीबाणीत स्वातंत्र्याचा गळा घोटला त्यावेळी आम्ही तुरुंग भोगला. तेव्हा चंद्रकांत पाटील कुठे होते? बारा वर्षे मी वाट पाहीली. भाजपमध्ये सध्याची पिलावळ काल आलेली आहे, त्यांच्याशी काय चर्चा करणार? पण अमीत शहांना पत्र लिहिले पण माझे ऐकले नाही, करण्यासारखे कामही दिले नाही. मी कामाचा भुकेला होतो. ज्यांनी रक्त सांडले, घाम गाळला. जेल भोगली त्यांना भाजपमध्ये किंमत नाही. त्यामुळे आता माझा ‘आरएसएस’शीही संबंध उरला नाही. 

बोराळकरांची विधाने बालिश 
पदवीधरांचे मत कमवावे लागते. जो कायम संपर्कात असतो तोच टिकतो. समोरील पक्ष म्हणतो की, सतीश चव्हाण यांनी तोंड उघडले नाही. याउलट चव्हाण यांनी सभागृह वारंवार दणाणुन सोडले. कामे केली, बोराळकर केवळ उमेदवारी अर्ज भरतात मग त्यांचा संपर्क नसतो. चव्हाणांचा कार्य अहवाल सभागृहाच्या रेकार्डवर आहे. भाजपचा कार्य अहवाल कुठे आहे? बोराळकरांची विधाने बालिश आहेत. सतीश चव्हाण किमान २५ हजार मतांनी निवडून येतील असा विश्‍वास असल्याचेही गायकवाड म्हणाले. 

(संपादन-प्रताप अवचार)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT