बालरक्षक.jpg
बालरक्षक.jpg 
छत्रपती संभाजीनगर

बालरक्षक रोखणार शाळाबाह्य मुले 

संदीप लांडगे

औरंगाबाद : आरटीआय कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला नियमित शिक्षण मिळणे आवश्यक आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्यता वाढली आहे. विद्यार्थ्यांचे पालकांसोबतचे स्थलांतर रोखण्यासाठी राज्यात ‘एक गाव एक बालरक्षक’ मोहीम राबविण्यात येणार आहे. 

दरवर्षी ऊसतोड, वीटभट्टीच्या कामासाठी अनेक पालक परजिल्ह्यात स्थलांतर करतात. त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी हंगामी वसतिगृहे स्थापन केली जातात; तसेच प्रत्येक गावपातळीवर तसेच तालुक्यात ‘बालरक्षक’ मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेअंतर्गत स्थलांतर होणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला जातो. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह राहण्याची, जेवणाची सर्व सुविधा केली जाते. 

मागील वर्षी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या बालरक्षक मोहिमेला मोठे यश आले होते. याअंतर्गत जिल्ह्यातील पैठण व कन्नडला प्रत्येकी सहा तसेच सोयगाव, फुलंब्री आणि वैजापूर तालुक्यात प्रत्येकी एक असे १५ हंगामी वसतिगृह स्थापन करण्यात आले होते. यात सुमारे तीन हजार ३८० विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यात शिक्षण विभागाला यश आले होते. यंदा कोरोनामुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. परिणामी, राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. कोरोनामुळे रोजगाराची समस्या वाढल्याने गावातील मजुरी करणाऱ्यांचे स्थलांतरदेखील वाढले आहे. या पालकांसोबत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी ‘एक गाव एक बालरक्षक’ मोहीम शासनाने हाती घेतली आहे. 

अशी आहे मोहीम 

  • कोणत्याही एका शिक्षकाची बालरक्षक म्हणून समितीने नियुक्ती करावी 
  • बालरक्षकाचे नाव शाळा व ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागावर लावावे 
  • सर्व बालकांना पाठ्यपुस्तके मिळतील, असे प्रयत्न करावेत 
  •  कोरोना काळात मुलांना ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने शिक्षण द्यावे 
  •  विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक संतुलनावर लक्ष ठेवणे 
  •  बालरक्षकांनी अनियमित व शाळाबाह्य मुलांची माहिती घेऊन पाठपुरावा 

(संपादन-प्रताप अवचार)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT