संग्रहीत फोटो११.jpg 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : दहावीनंतरच्या प्रवेशासाठी यंदा विद्यार्थ्यांमध्ये लागणार स्पर्धा

संदीप लांडगे

औरंगाबाद : दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यावर्षीच्या निकालाचे वैशिष्ट्य पाहता ९० टक्क्यांवर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे लोकप्रिय महाविद्यालये, आयटीआय, तंत्रनिकेतनचे ट्रेड मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. यात कमी गुण मिळवलेले किंवा काठावर पास झालेल्या विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   
यंदा राज्यातील औरंगाबाद, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, मुंबई, कोकण व लातूर या नऊ विभागीय मंडळांमधून १५ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १५ लाख एक हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी सरासरी ९५.३० टक्के आहे. 

राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी पाच लाख ३९ हजार ३७३ विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणी, पाच लाख ५० हजार ८०९ विद्यार्थी प्रथम श्रेणी, तीन लाख ३० हजार ५८८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यात ८० हजार ३३५ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल १८.२० टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध शैक्षणिक प्रवेशासाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.

औरंगाबाद विभागातून ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे तब्बल ६५ टक्के विद्यार्थी आहेत. सध्या इयत्ता अकरावी, आयटीआयसह इतर तंत्रविषयक अभ्यासक्रमासाठी कॉलेज, महाविद्यालयांकडून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वाधिक लोकप्रिय महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी तुंबळ स्पर्धा आहे. केवळ अर्ध्या किंवा पाव टक्क्याने विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीच्या महाविद्यालयातील प्रवेशापासून मुकावे लागू शकते. 

औरंगाबादेत मोठी स्पर्धा 

यंदा औरंगाबाद महापालिका क्षेत्रात अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत कला विभागाच्या ८ हजार ६१५, कॉमर्सच्या ५ हजार ६२५, विज्ञान शाखेच्या १४ हजार ४४० व एचएसव्हीसीच्या २ हजार ४६५ अशा एकूण ३१ हजार १४५ जागा आहेत. तर आयटीआय प्रवेशासाठी केवळ दोन हजार ३४० जागा आहेत. यंदा औरंगाबाद जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेत ५९ हजार ५२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकरावी व आयटीआय अशा दोन्हीच्या मिळून एकूण ३३ हजार ४८५ जागा उपलब्ध आहेत. उपलब्ध जागेच्या तुलनेत दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या खूप जास्त आहे. तसेच बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचेही आयटीआयच्या प्रवेशाकडे लक्ष असल्याने प्रवेशाचे विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हान असणार आहे. 

Edited By Pratap Awachar 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Return : आयकर विभागाचा करदात्यांना इशारा! 31 डिसेंबरनंतर थेट 5,000 दंड; ITR मध्ये चूक असेल तर आत्ताच हे करा

Latest Marathi News Live Update : मूदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

Tulsi Puajn Diwas 2025: आज तुळशी पूजनाचा खास दिवस! ‘हे’ उपाय केल्यास घरात नांदेल सुख-समृद्धी

Satara Crime: इन्स्टाग्रामवरील मैत्री आली अंगलट! कास पठार फिरवण्याच्या बहाण्याने बोलवलं अन् नंतर असं काही घडलं की...

Viral Memes : कोल्ड प्ले किस, महाकुंभ मोनालीसा ते इंडियन बजेटपर्यंत...2025 वर्षांत व्हायरल झाले टॉप 10 मिम्स, हसून हसून पोट दुखेल

SCROLL FOR NEXT