Eleventh Class admission 
छत्रपती संभाजीनगर

Junior College Admission: कनिष्ठ महाविद्यालयांना रिक्त जागांचा फटका, शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती

संदीप लांडगे

औरंगाबाद : पुणे-मुंबईच्या धर्तीवर मागील तीन वर्षापासून औरंगाबाद महापालिका हद्दीतील महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या ऑनलाईन पद्धतीचा फटका शहरातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांना बसला आहे. यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहात असल्याचे दिसून आले आहे. त्याचा परिणाम कला, वाणिज्य शाखेच्या तुकड्यांवरही होत असून शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती बळावली आहे. 

यंदा अकरावी प्रवेशासाठी शहरात एकूण ११६ महाविद्यालये असून त्यांची प्रवेश क्षमता ३१ हजार ४६५ आहे. त्यापैकी अर्जाचा भाग एक १९ हजार ५४३ विद्यार्थ्यांनी भरला असून, पडताळणी १९३५९ विद्यार्थ्यांनी केली आहे. अर्जाचा भाग दोन हा १६ हजार ४०४ विद्यार्थ्यांनी भरला. पहिल्या फेरीसाठी ८ हजार ७४० विद्यार्थ्यांपैकी ६५६७, दुसऱ्या फेरीत ५०४४ पैकी३०३६, तीसऱ्या फेरीत १८७२ पैकी, ८१८ तर स्पेशल फेरीत ३२९३ पैकी २९०७ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली होती. याफेऱ्यांमधून केवळ १२ हजार १८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यानंतर स्पेशल राऊंड दोनमध्ये ९२० विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही ५० टक्के जागा अद्याप रिक्तच आहेत. 

मागील काही वर्षापासून महापालिका हद्दीतील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. जेंव्हापासून शहरात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यास सुरुवात झाली, तेव्हापासून महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहात आहेत. मागील वर्षी सुमारे चार हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवाढीप्रमाणेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे. त्यात फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची भर पडली आहे. तरीही यंदा पंधरा हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त राहाण्याची शक्यता आहे. त्यात विशेषतः लहान महाविद्यालये व शाळांना जोडलेली कनिष्ठ महाविद्यालयांना रिक्त जागांचा सर्वाधिक फटका बसत आहे. 


वाणिज्य, कला शाखेच्या  सर्वाधिक जागा रिक्त 
मनपा परिसरातील विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल हा विज्ञान शाखेतील प्रवेशाकडे असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मागील काही वर्षाप्रमाणेच यंदा कला आणि वाणिज्य शाखेच्या जागा रिक्त राहाण्याची शक्यता आहे. शाळांना जोडलेले कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थी मिळत नसल्यामुळे त्यांच्या समोर आर्थिक प्रश्न निर्माण होत आहे. दरवर्षी मोठ्या महाविद्यालयांना वाढीव तुकड्या अतिरिक्त जागा मंजूर होतात. त्यामुळे लहान महाविद्यालयांसमोरील प्रश्न सुटत नसल्याचे कनिष्ठ महाविलयांच्या प्राचार्यांनी सांगीतले.

Edited - Ganesh Pitekar 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्रातील राजुरामध्ये ६ हजार ८५० मते वाढली- राहुल गांधी

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

'दशवतार' सिनेमा ऑनलाइन लीक! अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली...'आपल्याच माणसांनी असं...'

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

SCROLL FOR NEXT