corona image.jpg 
छत्रपती संभाजीनगर

अन्यथा औरंगाबाद शहरात असते सात हजार रुग्ण..!

माधव इतबारे

औरंगाबाद : जून महिन्यात शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तब्बल सात हजार एवढी राहील, असा अंदाज केंद्र शासनाने व्यक्त केला होता. मात्र, सुमारे तीन महिन्यांत शहरात रुग्णांची संख्या दोन हजारांवर गेली. महापालिकेच्या प्रयत्नांमुळे रुग्णवाढीला काहीसा ब्रेक लागला असला तरी मृत्युदर राज्यात सर्वाधिक असल्यामुळे औरंगाबादकरांची चिंता वाढली आहे. 

शहरात कोरोनाबाधित पहिला रुग्ण मार्च महिन्यात आढळून आला होता. सुरवातीचे काही दिवस एक-दोन रुग्ण आढळून आल्यामुळे महापालिका प्रशासन बिनधास्त होते. मात्र एप्रिल, मे व त्यानंतर रुग्णांची संख्या झापट्याने वाढली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आधी राज्य शासनाने व नंतर केंद्र शासनाने लॉकडाउनचा निर्णय घेतला. याचवेळी ज्या शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

तिथे पुढील काही काळात रुग्णसंख्या किती होऊ शकते, याचे अंदाज बांधण्यात आले होते. ही आकडेवारी पाहून सर्वांनाच धडकी भरली होती. या अंदाजानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात औरंगाबाद शहराची रुग्णसंख्या सात हजारपर्यंत जाण्याचा धोका होता; पण महापालिकेने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे रुग्णांची संख्या रोखण्यात काही प्रमाणात यश आले आहे. मात्र, औरंगाबादचा मृत्युदर राज्यात सर्वाधिक म्हणजे सरासरी ५.४ एवढा आहे, तर राज्याचा मृत्युदर सरासरी तीन टक्के एवढा आहे. 

दहशत कायम  
राज्यातील काही शहरांत रुग्णांचे आकडे कमी होत असताना मुंबईपाठोपाठ औरंगाबादेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे, तर दुसरीकडे कोरोनाची दहशत वाढत आहे. 


एकाच दिवसातील सर्वाधिक संख्या
शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने संपर्कातील नागरिकांना क्वारंटाइन करण्याचा धडाका सुरू केला आहे. एकाच दिवसात ३३८ जणांना क्वॉरंटाइन केले आहे.
शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी (ता.१०) दिवसभरात जिल्ह्यात १२१ जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : हिंसाचारात होरपळून निघालेल्या मणिपूरला पंतप्रधान मोदी आज देणार भेट

Mumbai : अभिनेत्रीनं धावत्या लोकलमधून मारली उडी, डोक्याला अन् पाठीला गंभीर दुखापत; रुग्णालयात उपचार सुरू

ENG vs SA 2nd T20 : इंग्लंडचा T20I मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला; नोंदवले एकापेक्षा सरस रेकॉर्ड

Nagpur News: रेल्वेच्या छतावर चढताच विजेचा धक्का; युवकाची प्रकृती चिंताजनक, रेल्वे स्थानकावरील घटना

मोठी बातमी! पगारावरील शिक्षकांनाही द्यावी लागणार ‘टीईटी’; सुप्रिम कोर्टाच्या निकालावर राज्य सरकार गप्पच; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेणार २३ नोव्हेंबरला ‘टीईटी’

SCROLL FOR NEXT