Fruit
Fruit 
छत्रपती संभाजीनगर

शेतकऱ्यांनो, अशा वाचवा फळबागा, ही घ्या काळजी

सुषेन जाधव

औरंगाबाद : मे महिन्यातील तापमान लक्षात घेता फळबागा जपण्याचे आव्हान आहे. यंदा लवकरच तापमानात भरीव वाढ झाली असली, तरी शेतकऱ्यांनी शिफारशीनुसार फळबागांना जपल्यास धोका संभवत नसल्याचे सांगत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी काही शिफारशी सुचविल्या आहेत. सेंद्रिय आच्छादन हा कमीत कमी खर्चात, अल्पावधीत सहज करता येणार उपाय असल्याचेही शास्त्रज्ञांनी सांगितले.

कृषी विद्यापीठाअंतर्गत औरंगाबादेतील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सु. बा. पवार यांनी सांगितले, की सध्या तापमानाची झळ वाढत आहे, अशा परिस्थितीत फळबागांना जपणे हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असते. मागील वर्षी पावसाळ्यात सरतेशेवटी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने यंदा फळबागांची चांगली स्थिती आहे, असे असले, तरी फळांचीही स्थिती चांगली असल्याने पाणी जास्त लागणे साहजिकच आहे.

ही वापरा त्रिसूत्री
मुख्यत्वेकरून फळबागांना तापमानापासून वाचविण्यासाठी सेंद्रिय आच्छादन, तीस मायक्रॉनपर्यंत प्लॅस्टिक आच्छादन, फळे, फांद्यांची विरळणी ही त्रिसूत्री वापरण्याचे आवाहन डॉ. पवार यांनी केले. फळबागेला पोटॅशिअम नायट्रेट हे २०० ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

मोसंबीसाठी ठिबक सिंचन असेल तर प्रतिदिवस ८० लिटर (फळ असल्यास) आणि फळे नसतील तर ५ ते सहा लिटर द्यावे. मोसंबीच्या झाडांची छाटणी करावी (फांद्या कमी कराव्यात. यामुळे पानांवाटे होणारे बाष्प होणार नाही; तसेच फळांची संख्या कमी झाली तर पाणीही कमी लागते.) डाळिंबाला जर फळे असतील तर ३५ ते ४० लिटर प्रतिदिवस पाणी द्यावे.

प्लॅस्टिक डाळिंबाला कव्हर करून घ्यावे. डाळिंबालाही सेंद्रिय आच्छादन करावे. लहान असेल तर झाकून घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. सोबतच आठशे ग्रॅम केओलिन दहा लिटर पाण्यात मिसळून फवारले तरी चालेल, असेही डॉ. पवार म्हणाले.

आंब्याच्या रोपांना करा सावली
आंबेबहार धरल्याने या फळझाडाची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. जानेवारीमध्ये ताण सोडला असल्याने या बागेस ताण सोडून तीन महिने झाले आहेत. तिसरे जी पाच वर्षांखालील बाग असेल त्याही बागेची काळजी घ्यावी लागणार आहे.

लहान झाडांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी झाडास सावली करण्याचे आवाहन विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्‍वर ठोंबरे यांनी केले आहे; तसेच बागांना सकाळी किंवा सायंकाळी पाणी द्यावे, असेही श्री. ठोंबरे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT