00E sakal janavrfe.jpg
00E sakal janavrfe.jpg 
छत्रपती संभाजीनगर

अतिवृष्टीची वक्रदृष्टी : मराठवाड्यात जवळपास सहाशे जनावरांचा बळी 

मधुकर कांबळे

औरंगाबाद : यावर्षीच्या पावसाळ्यात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीने मराठवाडा विभागात तब्बल ५९३ पशुधनाचे बळी घेतले. यामध्ये साडेतीनशेवर दुभती जनावरे होती. दुभती जनावरे मरण पावल्यांमुळे पशुपालकांचे शेतीबरोबरच दुग्धोत्पादनाच्या पूरक व्यवसायाचेही मोठे नुकसान झाले आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
पावसाळा संपला असला तरी अद्याप परतीचा पाऊस सुरूच आहे. या महिन्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे अद्याप पंचनामे पूर्ण झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले, तथापि पावसाळ्याला सुरुवात झाल्यापासून जूनपासून ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीने केलेल्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार, विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये १९ लाख ९१ हजार ४३२ हेक्टर जिरायती क्षेत्राचे नुकसान झाले.

तथापि, अजून परतीचा पाऊस पूर्णपणे थांबलेला नसल्याने नुकसानीच्या आकड्यांमध्ये बदल होऊ शकतो. शेतीतील काढणी करून ठेवलेल्या तसेच उभ्या पिकांचे पावसाने नुकसान केले आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे जीवितहानीही बरीच झाली आहे. जूनपासून १५ ऑक्टोबरच्या दरम्यान ५९३ पशुधनाचे बळी गेले आहेत. ३१२ मोठी दुभती जनावरे तर ८२ दुभती लहान जनावरांचा यामध्ये समावेश आहे. उर्वरित कामांसाठीची १९९ जनावरे या अतिवृष्टीत मृत्युमुखी पडली आहेत. 


बळी गेलेले जिल्हानिहाय पशुधन 

  • देड - १३७ 
  • जालना - ११४ 
  • औरंगाबाद - ८७ 
  • उस्मानाबाद - ८४ 
  • हिंगोली - ४२ 
  • परभणी - ३९ 
  • लातूर - ३४ 
  • बीड - २२ 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT