Ugale sir.jpg
Ugale sir.jpg 
छत्रपती संभाजीनगर

तुटपुंजी कमाई संपली, घर विकण्याची वेळ, गोंधळी कलावंत उगलेंची ह्रदयद्रावक कहाणी

सुशील राऊत

औरंगाबाद : आयुष्यभर परडी घेऊन केलेली तुटपुंजी कमाई या लॉकडाऊन मध्ये संपली. लॉकडाऊनचा कालावधी वाढत गेल्याने बायकोचे दागिने गहाण ठेवले. आता पंधरा दिवसांपासून घरात गॅस संपला आणि आठ हजार रुपयांचे लाईट बिल आल्याने लाईट बंद करण्याच्या नोटीस येत आहे. आता आम्ही जगायचं कस असा सवाल विचारताय शाहीर तुकाराम उगले.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
मूळचे गानोरी येथील तुकाराम रखामजी उगले (वय 65) ह. मु. राधास्वामी कॉलनी एकता नगर औरंगाबाद. हे गेल्या चाळीस वर्षांपासून गोंधळी व्यवसाय करून आपली उपजीविका भागवतात. मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून देशात लॉक डाऊन करण्यात आले. आणि या कलाकारांच्या तुणतुणं, संबळीचा आवाज थांबला. यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे.

गोंधळी हा आमचा पारंपरिक व्यवसाय असल्याने बालवयातच या कलेची ओळख झाली. परंतु शिक्षण सुरू असल्यामुळे वयाच्या पंधराव्या वर्षी या कलेशी खरी नाळ जोडली गेली. घराची जबाबदारी वाढल्याने 1976 ला शिक्षण सोडलं आणि हा व्यवसाय करायला सुरुवात केली. गेल्या 40 वर्षापासून लोक मनोरंजनातून समाज प्रबोधन करत आलो आहे. आज पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम झाले. असून अनेक ठिकाणी पुरस्कार मिळाले. तुकाराम उगले यांच्या खंडोबाचं लग्न, देवीचा गोंधळ, जांभूळ अश्या व्याख्यानावर संशोधन झाले आहे.
 
त्यांनी लॉकडाऊन दरम्यान घरातील खर्च भागवण्यासाठी नातलग -ओळखीच्याकडून उसनवारी करून पैसे घेतले. आता या पैश्यांची मागणी त्यांच्याकडून केली जाते. त्यामुळे त्यांचे पैसे कुठेन द्यायचे आणि घर कसं चालवायचं असा अडचणीचा प्रश्न आमच्या कलाकारांवर पडला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्या घरातील गॅस संपला असल्याने पावसाने ओल्या झालेल्या लाकडांच्या धुरात त्यांना स्वयंपाक करावा लागत आहे. घरात हातभार लागावा यासाठी त्यांच्या पत्नी धूण भांडी घासायची कामे करतात. त्यामुळे राहतं घर विकून उदरनिर्वाह करावा की अशी चिंता त्यांना सतावत आहे. 

सिजन गेले, कला सोडण्याची वेळ आली 

या वर्षाच्या सुरुवातीपासुनच लग्न सराई, गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, चैत्र यात्रा, उरूस पंढरपूरची वारी यासह एै सिजनाच्या वेळी काम बंद पडलं. यामुळे अनेक कलाकारांना उपासमरीची वेळ आली आहे. अनेकांना इच्छा नसतांना पोटाच्या खळगी भरण्यासाठी हा व्यवसाय सोडावा लागला. तर अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडत आहेत. यामुळे अनेक कलाकार कला सोडून मोल मजुरीचे काम शोधात आहे.


मायबाप सरकाने सर्व कलावंत बांधवांच्या होणाऱ्या हाल अपेष्ठाचा विचार करावा. इतर व्यवसाय करण्याचा ज्या प्रमाणे नियम व अटीच्या शर्ती देऊन परवानगी दिली. त्याच प्रमाणे आम्हाला नियम व अटी सह पोट भरण्यासाठी परवानगी द्यावी. 

-तुकाराम उगले, (शाहीर)

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT