Aurangabad Crime News 
छत्रपती संभाजीनगर

पैठण तालुक्यातील तिहेरी हत्याकांडाचा गुंता सुटला; जुन्या वादातून हत्या केल्याची आरोपीने दिली कबुली

चंद्रकांत तारु

पैठण (जि.औरंगाबाद) : जुने कावसन (ता.पैठण) येथील निवारे हत्याकांडात पकडलेल्या आरोपी अक्षय प्रकाश जाधव (वय २७)  याने जुन्या वादातून निवारे कुटुंबातील तीन जणांची हत्या केली असल्याची कबुली दिली आहे. दरम्यान आरोपीला पैठण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बुधवारपर्यंत (ता.१३) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी दिली. जुना वाद कशातून घडला ही बाब पोलिस तपासात स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले. पैठण शहरापासून जवळच असलेल्या जूने कावसन येथील राहत्या घरात या आरोपीने मध्यरात्री नंतर प्रवेश करुन राजु उर्फ संभाजी नारायण निवारे (वय ३५), अश्विनी संभाजी निवारे (वय ३०) या पती पत्नीसह नऊ वर्षीय मुलगी सायली या तिघांची हत्या ता.२८ नोव्हेंबर २०२० रोजी केली होती.

या हत्येत तिघांच्या डोक्यावर, गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांचा खुन केला. या घटनेत त्यांच्या सात वर्षाचा मुलगा सोहम ही गंभीर जखमी झाला होता. त्याच्या ही गळा व डोक्यावर शस्त्राने वार केले होते. परंतु दैव बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला. या घटनेनंतर आरोपीने मोबाईल बंद करुन फरारी झाला. यानंतर त्याने नाशिक, पुणे, मुंबई, जालना, औरंगाबाद आदी ठिकाणी काही काळ वास्तव्य करुन फिरत असल्याने तसेच रात्रीच्या वेळेत रोडच्या कडेला शेतात झोपत असे. त्यामुळे त्याचा शोध घेणे पोलिसांना आव्हान ठरले.

शेवटी बुधवारी (ता.६) आरोपी हा विना क्रमाकांच्या मोटारसायकलने येवला येथून औरंगाबादकडे येत आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे वेग वेगळे पथके तयार करुन तसेच पोलीस ठाणे येवला, कोपरगाव, वैजापूर, विरगाव, गंगापूर, शिल्लेगाव, शिऊर व देवगाव रंगारी पोलीस ठाण्यास नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अक्षय प्रकाश जाधव याचा शोध घेत असताना तो महालगाव (ता.वैजापूर) येथे रोडने वैजापूरकडून गंगापुरकडे एका विना क्रमांकाच्या मोटारसायकलवर येताना दिसल्याने त्यास थांबण्याचा इशारा केला असता त्याने त्याचे जवळील मोटारसायकल सोडून तो शेतात पळून जाऊ लागला.

या दरम्यान, पैठण पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला जवळपास दोन किलोमीटर पाठलाग करुन अखेर पकडले. आरोपीचे ताब्यातून एक मोटारसायकल, एक मोबाईल हॅन्डसेट, एक चाकू , एक लोखंडी रॉड, एक सायकलची लोखंडी चैन असा एकुण ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी गोरक्ष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या घटनेचा तपास केला.

हत्याकांडाचा ४० दिवसानंतर लागला तपास!
दरम्यान, संपूर्ण जिल्हा हादरुन टाकलेल्या या तिहेरी निर्घृण हत्याकांडाचा तपास करण्यासाठी स्थानिक पोलिस निरीक्षक किशोर पवार, जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांनी राज्यातील अनेक मोठ्या शहरात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके पाठवून शोध घेतला. परंतु या घटनेत पोलिसांच्या हाती काहीच धागेदोरे लागले नाही. त्यामुळे पोलिस या घटनेतील आरोपीला जेरबंद करण्यासाठी डोळ्यात तेल घालून तपास केला व शेवटी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले.
 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : हिंसाचारात होरपळून निघालेल्या मणिपूरला पंतप्रधान मोदी आज देणार भेट

Mumbai : अभिनेत्रीनं धावत्या लोकलमधून मारली उडी, डोक्याला अन् पाठीला गंभीर दुखापत; रुग्णालयात उपचार सुरू

ENG vs SA 2nd T20 : इंग्लंडचा T20I मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला; नोंदवले एकापेक्षा सरस रेकॉर्ड

Nagpur News: रेल्वेच्या छतावर चढताच विजेचा धक्का; युवकाची प्रकृती चिंताजनक, रेल्वे स्थानकावरील घटना

मोठी बातमी! पगारावरील शिक्षकांनाही द्यावी लागणार ‘टीईटी’; सुप्रिम कोर्टाच्या निकालावर राज्य सरकार गप्पच; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेणार २३ नोव्हेंबरला ‘टीईटी’

SCROLL FOR NEXT