fish.jpg 
छत्रपती संभाजीनगर

हिवाळा आला, मासे आणा! औरंगाबादेत रोज पाच क्विंटल मासळी हवी 

मधुकर कांबळे

औरंगाबाद : थंडी सुरू झाली की मासे खाणाऱ्यांची संख्या वाढत असते. सध्या दररोज शहरात मासे खाणारे शौकीन पाच क्विंटल मासे खातात. यंदा चांगला पाऊस झाल्याने नदी, तलाव आणि धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने मासळीची उपलब्धताही मुबलक आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
यावर्षीच्या मान्सूनमध्ये अतिवृष्टी झाली. पर्यायाने नदी, तलाव, धरण, शेततळ्यातला पाणीसाठा वाढला असल्याने मत्स्योत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे. गोड्या पाण्यातील मासे स्वादिष्ट असल्याने त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. शहरात लहानमोठे शंभरावर मासे विक्रीची दुकाने आहेत. 

गोदावरी फिशचे बशीर कुरेशी म्हणाले, हिवाळ्यात मासे खाणाऱ्यांचे प्रमाण वाढत असते; मात्र आता काही डॉक्टर्स रुग्णांना मासे खाण्याचा सल्ला देत आहेत, त्यामुळे बाराही महिने मासे खाण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. गोड्या पाण्यातल्या माशांना चांगली मागणी आहे. रोज पैठण व इतर ठिकाणांहून शहरात मासे विक्रीसाठी येतात, शहरातील सर्व दुकानांमधून दररोज सुमारे पाच क्विंटल मासे विकले जातात. याशिवाय मुंबइहून येणाऱ्या सी फूडलाही चांगली मागणी आहे. खेकडे, ताजी कोळंबी, बोंबील, बांगडा, पापलेट या सी फूडला खवय्यांची अधिक पसंती असल्याचे ते म्हणाले. 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case : आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातल्या आणखी चौघांना अटक, हत्येनंतर गुजरातला झालेले फरार

Latest Marathi News Updates: पाकिस्तानच्या ग्रुपवर चॅट करण्याचं प्रकरण, नागपूरमधील दोघांची एटीएसकडून चौकशी

Besan Cheela Vs Oats Cheela: वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात बेसन चीला की ओट्स चीला फायदेशीर? वाचा एका क्लिकवर

Sinhagad Road : माणिकबाग परिसरात महापालिकेची अतिक्रमणविरोधी धडक कारवाई

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT