शेतकरी आत्महत्या औसा.jpg 
मराठवाडा

अतिवृष्टीने नुकसान; औसा तालूक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

जलील पठाण

औसा (लातूर) : कर्जबारी आणि नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने शेतातील सर्व पीक गेल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना औसा तालुक्यातील आंदोरा गावात गुरुवारी (ता.२२) रोजी घडली आहे. मधूकर श्रीरंग पवार (वय ५०) असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांना पत्नी, तीन मुली व एक अविवाहित मुलगा आहे.

निवळशेतीवर उदरनिर्वाह चालवत असलेल्या मधुकर पवार यांच्यावर सरकारी व खाजगी मिळून दोन लाखापेक्षा जास्त कर्ज आहे. हे कर्ज खरिप पिकांवर परतफेड करण्याचा त्यांचा मानस होता. मात्र १२ ते १५ अक्टोबर आणि ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसाने खरिपातील सर्वच पिके हातची गेली. त्यामुळे डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडावे, पुढील उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत ते होते. गुरुवारी (ता.२२) रोजी ते सकाळी लवकर नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेले होते.

मात्र कर्जाची धास्ती घेतलेल्या श्री. पवार यांनी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास स्वता:च्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती महादेव काशीनाथ शेळके यांनी भादा पोलिसांना दिली असता पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा दुजोरा तहसील कार्यालयानेही दिला आहे. गेल्या कांही वर्षापासून शेतकरी आत्महत्येचं शुक्लकाष्ट औसा तालुक्यातून बाजूला होत नसल्याचे दिसत आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Second Phase Schedule: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील ५० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, १३ एप्रिल ते २४ मे रोजी रंगणार सामने

युद्धामुळे संकट! केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार? PM मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, बोलावली बैठक

ट्रॅफिकला ब्रेक लागणार! १ तासाचा प्रवास आता फक्त १० मिनिटांत होणार; पूर्व-पश्चिम मुंबई जोडणारा गेमचेंजर प्रकल्प आहे तरी काय?

Mumbai News: मिठी नदीची साफसफाई केली जाणार, नऊ लाख टन गाळ उपशाचे उद्दिष्ट; कधीपासून काम सुरू होणार?

तुम्हाला माहिती आहे का? ‘धुरंधर’चं शूटिंग संजय दत्तच्या शाळेतच झालंय! 'हे' कलाकारही आहेत माजी विद्यार्थी

SCROLL FOR NEXT