janta karfew.jpg
janta karfew.jpg 
मराठवाडा

उस्मानाबादकरांना खुशखबर : रविवारचा जनता कर्फ्यू रद्द 

सयाजी शेळके

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला प्रत्येक रविवारचा जनता कर्फ्यू रद्द करण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी (ता. 23) याबाबतचे आदेश काढले आहेत. 

जिल्ह्यासह राज्यात कोरोनाने थैमान घातले होते. मार्च महिन्यापासून कोरोनाला नियंत्रित ठेवण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केले जात होते. सुरुवातीच्या काळात संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं. त्यानंतर यामध्ये थोडी शिथिलता देण्यात आली. जिल्हास्तरावर यावर निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले. कोरोनाची चैन ब्रेक करण्यासाठी जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. शहरांमध्ये तसेच संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक रविवारी जनता कर्फ्यू पळाला जात होता. दरम्यान गेल्या पंधरा दिवसापासून जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा रोडावला आहे. तसेच मृत्यूदरही कमी झाला आहे. त्यामुळे प्रशासन स्तरावर समाधान व्यक्त होत आहे. 

उस्मानाबाद शहरांमध्ये प्रत्येक रविवारी आठवडी बाजार भरत होता. परिणामी रविवारच्या जनता कर्फ्यूमुळे अनेकांची हेळसांड सुरू होती. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात असल्याने जिल्ह्यातील जनता कर्फ्यू रद्द करण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या निर्देशानुसार याबाबत आदेश काढले आहेत. त्यामुळे येत्या रविवारी (ता. २५) होणारा जनता कर्फ्यू रद्द करण्यात आला आहे.

तसेच यापुढेही जनता कर्फ्यू सुरू राहणार नाही. सध्या दीपावळी जेमतेम पंधरा दिवसांवर आली आहे. त्यामुळे रविवारचा जनता कर्फ्यू बंद झाल्याने नागरिकांना खरेदी करण्यासाठी रविवारी ही बाजारपेठ खुली राहणार आहे. असे असेल तरी सोशल डिस्टंसिंग पाळणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे आदी बाबी कायम असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT