teacher.jpg
teacher.jpg 
मराठवाडा

IMP NEWS : जालना शहरातील २३८ शिक्षक आता 'पोलिस मित्र', ही असेल जबाबदारी..!

सुहास सदाव्रते

जालना : शहरात कोरोना विषाणू संसर्गजन्य रोखण्यासाठी आता पोलिसासमवेत शिक्षकांना 'पोलिस मित्र ' म्हणून नियुक्ती आदेश जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी काढले आहे. शहरातील विविध शाळेतील २३८ शिक्षक कर्तव्य बजावणार आहे. 

शहरात कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. शहरातील नागरिकांना खबरदारी व दक्षता घेण्यासाठी पोलिसासमवेत आता शिक्षक कर्तव्य बजावणार आहे. याबाबतचे आदेश काढण्यात आले असून बुधवारी (ता.१५) संबंधित शिक्षकांनी दिलेल्या पोलिस स्टेशन अंतर्गत सेवा बजावायची असल्याचे आदेशात म्हटले आहे. जर हलगर्जीपणा आढळून आला तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

शहरातील त्रिभुवनदास विद्यालय, दानकुंवर विद्यालय, जनता हायस्कूल, डग्लस हायस्कूल, सरस्वती भुवन प्रशाला, शिवाजी हायस्कूल, विवेकानंद हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, उर्दू हायस्कूल, नूतन विद्यालय यासह जेईएस महाविद्यालय, पार्थ सैनिकी आदी शाळेतील २३८ शिक्षक आपली सेवा बजावणार आहे. शहरातील विविध भागात पोलिस मित्र म्हणून शिक्षकांच्या सेवा अधिगृहीत करण्यात आल्या असून नागरिक सामाजिक आंतर मर्यादा पाळतात की नाही, मास्क लावले आहे का यासह इतर बाबीवर कडक लक्ष ठेवावे लागणार आहे. नागरिकांना सूचना देणे, दंड वसूल करणे, कारवाई करणे आदी कामाची कार्यवाही करावी लागणार आहे.

शहरातील विविध शाळेतील २३८ शिक्षकांना पोलिस मित्र म्हणून नियुक्ती आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहे. मुख्याध्यापकांनी संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत आदेश दिले आहेत. 
आशा गरूड, शिक्षणाधिकारी, माध्यमिक                                                       

(संपादन : प्रताप अवचार )                                                                        

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT