Jalkot Us.jpg 
मराठवाडा

डोळ्यात उरलं फक्त पाणी ! जळकोट तालुक्यात ९७९ हेक्टर ऊस झाला भुईसपाट! 

शिवशंकर काळे

जळकोट (लातूर) : गेल्या वर्षी पाऊस जास्त झाल्याने साठवण तलाव ओहरफुल्ल झाले होते. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी तब्बल ९७९ हेक्टरवर ऊसाची लागवड केली होती. एक महिन्यात ऊस कारखाने घेऊन जाणार होते. पंरतू परतीच्या वादळी पाऊसाने ऊभा ऊस भुईसपाट झाल्याने ऊस उत्पादकाच्या डोळ्यात पाणी येऊ लागले.


जळकोट तालुका हा डोंगराळ भाग असल्याने या भागात गेल्या तीन वर्षांपासून पाऊस झाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पन्नास हेक्टरवरही ऊसाची लागवड केली नव्हती. पंरतू गेल्यावर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्याने साठवण व पाझर तलाव हाऊसफुल्ल झाले होते. पाणीसाठा उपलब्ध असल्याने  कंरजी, रावणकोळा, कुणकी, अतनुर, मंगरुळ, बेळसांगवी, सोनवळा या भागातील शेतकऱ्यांनी तब्बल ९७९ हेक्टर ऊसाची लागवड केली. सुरूवातीला ऊसाचे बेने आणून शेतात लागवण केली. यावर्षी सुरुवातीपासून पाऊस चांगला असल्याने ऊसाची वाढही चांगल्या प्रकारे झाली होती. ऊस चौदा ते पंधरा काड्यांवर असल्यामुळे उंची वाढली होती. परतीच्या पावसाच्या अगोदर वादळी वारे होऊन ऊस आडवा पडला होता. 

आढवा ऊस उभे करण्यासाठी राञ दिवस मेहनत घेऊन ऊस उभे केले होते. त्यामुळे पैसा व वेळ वाया गेला. दरम्यान मागील सहा सात दिवसांपूर्वी वादळी वाप्यासह तुफान पाऊस झाला. त्यामुळे ऊभा ऊस भुईसपाट झाला. परतीचा पाऊस राञी झोडपत असल्याने शेतकप्यांना कसलीही कल्पना नव्हती. सकाळी उठून शेतात गेल्यानंतर पाच -पाच एकरामधील ऊस आडवा पडून शेत भुईसपाट दिसत होते. एकवेळा आडवा पडलेला ऊस उभा करुन आणि त्यांची जोपसना करण्यासाठी लागलेला खर्च यातच शेतकप्यांचा खिशा रिकामा झाला होता.

त्यामुळे दुसरी वेळेस पडलेला आडवा ऊस उभे करण्यासाठी पैसे आणयाचे कुठून हा प्रश्न ऊस उत्पादक शेतकप्यापुढे पडला आहे. सध्या शेतात ऊस आडवा आसल्याने त्यांच्या मागे आता उंदराचे कळप लागल्याने आडव्या ऊसाचे नुकसान होत आहे. ऊसातून चांगले उत्पन्न मिळण्याची आशा ऊस उत्पादकांची होती. पंरतू परतीच्या पावसाने आशेवर पाणी फिरले आहे. आदी खरिपातील मुग, उडीद, सोयाबीन गेले. आता ऊसाचीही नासाडी होत असल्याने जगाचा पोशींदा जगावा कसा असा प्रश्न पडला आहे.
 

ऊस लागवड करण्यासाठी हेक्टरी तीस हजार रूपये खर्च झाला आहे. त्यात बेने, खुरपणी, खत, लागवड आदीवर खर्च झाला आहे. ऊभा ऊस असता तर एकरी चाळीस टन ऊस निघत होता.पंरतू आता ऊस आडवा पडल्याने ऊसाला पाणी व्यवस्थित पोहचत नाही. उंदीर मागे लागल्यावर एकरी वीस टन सुद्धा ऊस हाताला लागणार नाही. शासनाने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी. - सत्यवान पाटील, ऊस उत्पादक शेतकरी. 


तालुक्यात अनेक ठिकाणी परतीच्या पाऊसामुळे उभा ऊस आडवा पडला आहे.कृषि विभागाकडून पंचनामे करुन अहवाल शासनाकडे पाठविण्यात येत आहे.नजरचुकीने ऊसाचे पंचनामे राहिल्यास शेतकप्यांनी तालुका कृषि विभागाला संपर्क करावा -आकाश पवार तालुका कृषि अधिकारी जळकोट.

(Edited By Pratap Awachar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

Hyundai Bayon SUV: ऑटो बाजारात Hyundai चा धमाका; नव्या 'बेयॉन' SUV च्या लूक अन् डिझाइनचे पहिले स्केच आउट!

Team India : शुभमन गिल-गौतम गंभीरच्या मार्गात 'लक्ष्मण'रेषा! Asian Games च्या संघातील खेळाडू देण्यास नकार; विंडीज मालिकेत संघ संकटात...

Nalkehda Car Accident : रात्रीच्या अंधारात भाविकांवर काळाचा घाला! पुराच्या पाण्यात कार वाहून गेल्याने ३ मुलांसह ८ जणांचा मृत्यू

Latest Marathi News Update : मालकाच्या मुलीचा WhatsApp DP पाहिला अन् 3.70 कोटी पाठवले

SCROLL FOR NEXT