rain sakal Media
मराठवाडा

खरीप गेलंय, रब्बीची नाही आशा

हातडी येथील शेतकरी विलास बोरकर यांची व्यथा

सकाळ वृत्तसेवा

परतूर : अनेकांनी कर्ज काढून शेतीला लावले, मात्र पिके वाया गेली. आता कर्ज कसे फेडायचे ही चिंता सतावत आहे.यंदा पिकांचे नुकसान लय झालंय. खरीप गेलंय, जमीन वाहून गेली, खरवडली. आता रब्बीचीही आशा नाही, याचा शासनाने विचार करावा, मायबाप सरकारने तात्काळ मदत द्यावी, अशी भावना हातडी येथील शेतकरी विलास बोरकर यांनी व्यक्त केली.

हातडी परिसरात शेतीचे मोठे नुकसान झाले. आता दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पाण्यातील सोयाबीन काढणीची लगबग दिसून येत होती. मजूरही मिळत नसल्याने शेतकरी कुटुंबासह, युवकांसह शेतात सोयाबीनची काढणी करत आहे. कापसाची बोंड सडली आहेत. अनेकांच्या सोयाबीनला कोंबही फुटले. पावसाच्या भीतीमुळे थोडेबहुत निघालेल्या सोयाबीनची मळणी यंत्राद्वारे मळणी केली जात आहे. खरिपाची सर्वच पिके काही दिवसांपूर्वी जोमात होती. उत्पादन भरपूर होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. अतिवृष्टीसह पावसामुळे हातात आलेली पिके गेली. जी आहेत त्यात अधून मधून पडत असलेल्या पावसामुळे उत्पादन मिळणार नाही. शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई तात्काळ मिळावी, असे शेतकरी सुधाकर झरेकर, विलास बोरकर, भागवत शिंदे, विकास झरेकर आदींनी नमूद केले.

शेतकऱ्यांवर यंदा अत्यंत वाईट परिस्थिती आलेली आहे. शेतकऱ्यांचे गणित नियोजन बिघडले आहे. पाऊस नव्हता तेव्हा सोयबीन पीक जोमात होते, काढणीच्या वेळीच पिके पाण्यात गेली. मजूर काढण्यास येत नाहीत, पिके पाण्यात आहेत.

-सुधाकर झरेकर, हातडी, शेतकरी

निसर्गाच्या लहरीपणाचा सतत फटका बसत आहे. हाती आलेले पीक जाते, कधी पीक चांगले येते तर बाजारात भाव मिळत नाही. नुकसान ठरलेले आहे. खूप मेहनत घेऊन शेती पिकविली, पण अतिवृष्टीसह पावसाने पिकांचे नुकसान झाले.

- भागवत शिंदे, हातडी, शेतकरी,

शब्दांकन - राहुल मुजमुले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Decision about World Cup: भारत विश्वविजेता झाल्याच्या पाच दिवसांतच ‘ICC’ने विश्वचषकाबाबत घेतला मोठा निर्णय!

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

MahaBiz Summit : राज्यातील उद्योजकांना मिळणार जागतिक संधींचे व्यासपीठ ‘जीएमबीएफ’ व ‘एमईडीसी’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत ‘महाबिझ’चे आयोजन

Mahar Vatan Land Scam : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारानंतर खळबळ; 'महार वतन जमिनी बळकावणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा' महार वतन परिषदेची मागणी

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT