मुंबई

कोरोनाच्या प्रकोपातून महाराष्ट्रातील 5 जणांची सुटका

सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाच्या विशेष विमानाने चीनच्या वुहान भागातून भारतात आलेल्या प्रवाशांना दिल्ली आणि मानेसर आर्मी कॅम्प येथे विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले होते. विलगीकरण कक्षातील 14 दिवसांचा कालावधी संपल्याने आज महाराष्ट्रातील पाच प्रवासी राज्यात परतले आहेत. काल 36 प्रवासी राज्यात परतले होते. आतापर्यंत वुहान येथुन राज्यात परतलेल्या प्रवाशांची संख्या 41 झाली आहे. या सर्व प्रवाशांचा 14 दिवसापर्यंत आरोग्यविषयक पाठपुरावा करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. 

आजपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 43 हजार 31 प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून 274 प्रवासी आले आहेत. पैकी 163 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. 

राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत 74 जणांना भरती करण्यात आले. त्यापैकी 71 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन आय व्ही पुणे यांनी दिला आहे. आजवर भरती झालेल्या 74 प्रवाशांपैकी 70 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या प्रत्येकी 2 जण मुंबई व पुणे येथे भरती आहेत. 
दरम्यान,चीनमधील 645 भारतीयांना वुहान शहरामधून एअर इंडीयाच्या विमानाने आणण्यात आले होते. हे सर्व भारतीय नागरिक आय टी बी पी नवी दिल्ली आणि आर्मी कॅम्प, मानेसर येथे 14 दिवसांकरता विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या सर्वांच्या प्रयोगशाळा चाचण्या करोना आजारासाठी निगेटिव्ह आल्या आहेत. आपला विलगीकरण कालावधी संपल्यानंतर आता हे प्रवासी आपापल्या मूळ गावी परतत आहेत.

आज आणखी 5 जण राज्यात परतले आहेत. खबरदारी म्हणून या प्रवाशांचा पुढील 14 दिवसांकरिता पाठपुरावा करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारच उपमुख्यमंत्री! रात्री उशिरा मुंबईकडे रवाना; प्रथमच महिलेकडे पद

काटेवाडी ते मंत्रालय... नेतृत्वासाठी तयार झालेलं व्यक्तिमत्त्व; सामाजिक कार्यकर्ता ते उपमुख्यमंत्रीपद, सुनेत्रा पवारांचा ऐतिहासिक प्रवास

Mumbai Traffic: मुंबईत १ तारखेपासून नवीन वाहतूक नियम; दक्षिण भागात अधिक कठोर नियम, 'या' वाहनांना प्रवेश नाही

Budget 2026: बजेट तयार करण्यासाठी किती वेळ लागतो? ‘ब्लू शीट’ म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या पडद्यामागची प्रक्रिया...

Pune Traffic : नवले पुलावर तीन ते पाच फेब्रुवारीदरम्यान लेन बंद; कात्रज जुना बोगदा आणि सेवा रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT