मुंबई

३३ वर्षानंतर मिळाली आईची चेन, फक्त आज आई असायला हवी होती..  

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई पोलिस सतत लोकांच्या समस्या सोडवण्याच काम करत असतातच. मात्र आज मुंबई पोलिसांनी ३३ वर्षांपासून रखडत  पडलेली चोरी केस सोडवलीये.  मुंबई पोलिस सध्या लोकांना त्यांच्या चोरी झालेल्या अमूल्य वस्तु आणि दागिने परत करत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत तब्बल २ कोटींचे दागिने लोकांना सुपूर्त केलेत. दिलीप शहा यांना आज पोलिसांनी त्यांच्या आईची ३३ वर्षांपूर्वी चोरीला गेलेली सोन्याची चेन परत केली आणि त्यांना अश्रु अनावर झाले. मुंबई पोलिस अजूनही काही दागिने गुढीपाडव्याला सुपूर्त करणार आहेत.

आज आई असायला हवी होती

दिलीप शहा यांच्या आईची सोन्याची चेन तब्बल ३३ वर्षांपूर्वी म्हणजेच १९८६ मध्ये एका देवळासमोरून मारण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास करूनही चेन मिळाली नाही. त्यांनी आणि त्यांच्या आईंनी चेन परत मिळेल ही आशा देखील सोडली. आज चेन परत मिळते मिळालीये, मात्र हे सुख बघायला त्यांची आई या जगात नाही. म्हणूनच शहा यांना अश्रु अनावर झाले. आता ही चेन ताब्यात मिळाली की शाह कुटुंब ही चेन देवळात दान करणार आहेत.

 तो आनंदच वेगळा

असाच काहीसा प्रकार भाईंदरमध्ये राहणार्‍या भावना देसाई यांच्यासोबत देखील घडला. विद्याविहार स्टेशनवरुन त्यांची चेन चोरीला गेली होती. आपल्या वडिलांबरोबर पोलिसात तक्रार नोंदवली मात्र त्यांना चेन मिळाली नव्हती. आज ती मिळाल्याने यासारखा दूसरा आनंद नाही असं त्या म्हणाल्या.

आतापर्यंत मुंबई पोलिसांनी चोरीला गेलेले नागरिकांचे दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तु आणि पैसे परत दिले आहेत. अजूनही काही गोष्टी गुढीपाडव्याला लोकांना परत दिल्या जाणार असल्याचं जीआरपी कमिशनर रविंद्र सेंगावकर यांनी म्हंटलय. 

after 33 years mumbai police found lost chain of dilip shahs mother

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT